मराठी कविता.....• » мαяαтнι ρσєм « •

आपल्या कविता (एक संग्रह) !! इत्यादी !!!!!!!

आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात
रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर
भंगलेल्या तोंडाचेही मुके
घ्यावे लागतात

मी असा असतानाही
मी तसा आहे ह्याचं
नाटक करावं लागतं
पण मग
हे नाटकच आहे हे
विसरून कसं चालेल?

कसले कसले
असले तसले झाले
की मग
असले तसले
कसले कसले होतात
आणि मग
मी माझ्याच हिंमतीवर आलो
आणि
माझ्याच हिंमतीवर रहाणार
असे म्हणताना
ही हिंमत तात्पुर्ती आहे
हे विसरून कसं चालेल?

अंधार दूर करणारा
प्रकाश पाहून
कंदीलाचे आभार मानावे लागतात
पण मग
कंदील हातात धरून
प्रकाश दाखवणाऱ्याला
विसरून कसं चालेल?

गेले ते गेले
आणि राहीलेले पण जाणार
असे म्हणताना
आपण पण राहील्यातले आहो
हे विसरून कसं चालेल?

जो तो आपल्या अक्कलेने बोलतो
पण मग अक्कलच गहाण ठेवली
तर मग
मुर्खपणाचं बोलणं होतं
हे विसरून कसं चालेल?

लहानानी मोठ्यासारखं वागावं
अन
मोठ्यानी मोठ्यासारखं वागावं
पण मग

मोठेच लहानासारखे वागले
तर मग
मोठेपणाचे महत्व
विसरून कसं चालेल?

शेवटी काय?

जात्यात रगडलेले पाहून
सुपातले हंसतात
पण मग
सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार
हे विसरून कसं चालेल?

स्वप्नील............

मरण मला पाहून हंसले

मागे वळून मी पाहिले
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची, न विसरता

असते मी सदैव सर्वांच्या मागे
सावली होऊन पहाते कोण कसा वागे
झडप घालते पाहून तो गाफील
जो न समजे जीवन असे मुष्कील

खातो मी सदैव हेल्थी फूड
ठेवीतो माझे मी आनंदी मूड
घेतो मी नियमीत व्यायाम
का मी नये राहू इथे कायम

जनन मरण असे निसर्गाचा नियम
घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची
वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची
जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त
मरणे हे तरी असे उद्याचे सत्य......

स्वप्नील............


एक होती तानुली
तिचं वय होत सहा
आणि गम्मत पहा
तिचा एक होत आजा
त्याचे वय होते सहा वर सहा
तानुली आजावर खूप प्रेम करायची
आजा पण तानुली वर खूप प्रेम करायचा
कधी कधी तिला आंघोळ घालायचा
तिचे अंग पुसून कपडे घालायचा
केस पुसून वेणी घालायचा
आणि डोळे मिटून गप्प बसायचा
तानुली म्हणायची थ्यान्क्यू आजा
आणि आजा म्हणायचा वेल्कम तानु
कधी कधी तानुली पण आजाला मदत करायची
आजा म्हणायचा थ्यान्क्यु तानु
आणि तानु म्हणायची वेल्कम आजा
आणि आजा डोळे मिटून गप्प बसायचा
एकदा तानुली म्हणाली
आजा तू डोळे का मिटतोस?गप्प का रहातोस?
आजा म्हणाला ते आहे एक गुपीत
मला गुपीत सांगशील का?
असं विचारलं तानुने
ओके तानु असं म्हटलं आजाने
ऐक
एक होती मुलगी
तिचं वय होत सहा
आणि तिचा एक होत डयाडी
त्याचे वय होत तिनावर सहा
ती डयाडीवर खूप प्रेम करायची
तिच्यावर डयाडी खूप प्रेम करायचा
कधी कधी तिला आंघोळ घालायचा
अंग पुसून कपडे घालायचा
केस पुसून वेणी घालायचा
आणि उघडया डोळ्याने
तिच्या कडे बघत बसायचा
मग ती खूप खूप हसायची
आणि डयाडी तिला जवळ घ्यायचा
हे ऐकून तानुली हसली
अन
आजाला त्या मुली सारखी दिसली
आजाने तानुलीला जवळ घेतलं
आणि तानुलीला गुपीत कळलं
गुपीत फ़ोडताना आजाला झाली घाई
कारण ती मुलगी होती तानुलीची आई.......


स्वप्नील............


मातेच्या मांडीवर माथे टेकून
थोपटण्याचा हट्ट करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले.

भावंडामधे हंसून खेळून
कधी मधी नाहक भांडून
क्शमा याचनाचे
ते दिवस निघून गेले

ग्रुहपाठ करून सुद्धा
शाळेत जाऊन
गुरुजीचा ओरडा खाण्याचे
ते दिवस निघून गेले

सुगंधी तेले चोपडून
केसाचा कोंबडा काढून
नेत्र पल्लवी करण्याचे
ते दिवस निघून गेले

घारीच्या पंखाचे बळ घेऊन
निळ्या नभाकडे न्याहाळून
ऊंच ऊंच भरारींच्या स्वपनांचे
ते दिवस निघून गेले

राजा राणीचा संसार करून
मनोरथाचे बंगले बांधून
विश्वाचे रहस्य उलगडण्याचे
ते दिवस निघून गेले

ग्रुहपाठाचे धडे घेऊन
संस्काराचे धडे देऊन
पिल्लांना जोपासण्याचे
ते दिवस निघून गेले

काऊ चिऊच्या गोष्टी सांगून
चिमण्या नातवंडाना अंगाई करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले

या यादीतील स्म्रुतीना
निश्चीत आहे अंत
त्यानंतर
दिवस निघून जाण्याचे
नसे कसला खंत..........

स्वप्नील............

नेहमी प्रमाणे मी आणि तानुली तिच्या स्कूलबसची वाट बघत ड्राईव्ह्वेवर येरझारया घालीत होतो.सहजच मी तानुला म्हणालो ” तानुली,”दोन” “एका”पेक्षा मोठा,” तीन ” “दोना ” पेक्षा मोठा असे करत करत “नवू”सगळ्यांपेक्षा मोठा मग “शून्याचे” काय?
तानुला “शून्याचे”खूप वाईट वाटले.ते मला तिच्या चेहरयावरून दिसले.ती म्हणालीच “पुअर झीरो” मी म्हणालो “तानु,”झीरोच” खरा “हिरो” आहे.संध्याकाळी तूं शाळेतून आल्यावर “झीरोवर”एक कविता करतो.ती वाच्ल्यावर तुला कळेल “शून्याची”महती.

शून्याची महती

एकदां “दोन” म्हणे “एकाला”
आहेच मी तुझ्या पेक्षा मोठाला
ऐकून हे वाटे “तीनाला”
माहीत नाही का “एक” आणि “दोनाला”
मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठला

दोन शिंगी “चार” होता आपल्या घरात
हे संभाषण गेले त्याच्या कानात
ओरडून तो म्हणाला वरच्या आवाजात
ऐकल कारे “एक” “दोन” आणि “तिना”
“पांच” “सहा” “सात” “आठ”आणि मीना
कबूल झालो आहे “नऊना”
तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे

“शून्य” बिचारा कोपरयात होता बसून
ऐकून सारे आले त्याला भरभरून
स्वत:शीच म्हणाला
ठाऊक नाही त्यांना माझी किंमत
घेऊन मला शेजारी,जेव्हां
एखादा दाखवील हिम्मत
व्रुद्धी होईल त्याची कळत नकळत

सूर्य,चन्द्र,तारयांचा आहे
माझ्या सारखा आकार
पण सांगतात का ते कधी
आमचाच आहे सर्वांवर अधीकार

नको स्वत:ची शेखी मिरवूं
चढावर वरचढ असोतो छपून
करा बेरीज अथवा गुणाकार सगळे मिळून
त्यामूळे
घ्याल तुम्ही तुमची किंमत वाढऊन
लागू नका भागाकार वा
वजाबाकीच्या नादाला
लागेल ग्रहण तुमच्या किंमतीला

“एकाने” केली तक्रार “शून्याकडे”
नाही उपयोग माझा
करताना गुणाकार वा भागाकार
त्यावर
“शून्य”म्हणाला त्याला
करशील तूं व्रुद्धी बेरीज करताना
नंतर
“शून्य”पुसतो “एकाला”
आहे का माझा उपयोग
बेरीज करताना
खोड मात्र मोडतो मी
गुणाकार करताना

तात्पर्य काय?
म्हणे “शून्य”ईतर आकड्याना
“कमी लेखू नका कुणा
वेळ आली असताना
“शून्यसम”आकडाही
होत्याचे नव्हते
करतो सर्वाना.............

स्वप्नील............

म्हणे “वनस्रुष्टी” ईश्वराला
केलास तूं दुजा भाव
देवूनी वाचा अन
चाल “जीवस्रुष्टीला”

हंसला ईश्वर मनांत अपुल्या
म्हणे तो “वनस्रुष्टीला”
पस्तावलो मी वाटते मला
देऊन ते “जीवस्रुष्टीला”

एका बिजा पोटी तरुं कोटी
जन्म घेती सुमनें फळें
परी
वाचाळ होवूनी
केली “मानवानें”
सदैव भांडणे
दूर जावूनी विसरला
हा “मानव” अपुली मुळे........

स्वप्नील............

एकदां जिभली बोले दातांस
मी अशी (बिचारी) एकटी
तुम्ही मात्र आहांत पुरे बत्तीस

मला नाही हाड न काड
मी आहे स्नायुचा गोळा
चुकून फिरले ईकडे तिकडे
तुम्ही करता माझा चोळामोळा
करिती ते (लोक) तुमचा उपयोग
म्हणती बोललो आम्ही जिभ “चाऊन”

ऐकून हे जिभलीचे संभाषण
दातं म्हणती तिला
वाईट सवंय आहे तुला
घेतली जिभ लावली टाळ्याला

बडबड करिशी तूं भारी
निस्तरावे लागे आम्हांपरी
वटवट तुझी ऐकून
म्हणती ते (लोक) वैतागून
गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?
(बिचारे दांत)......


स्वप्नील............

मम्मी आजीची सत्तरी.

झालीस तूं आज सत्तर
एकोणपन्नास वर्ष्याच्या संसारात
त्रुप्त होवूनी असे वाटते
आज झाले ते बेहत्तर

प्रेम म्हणजे विश्वास
अन जीवनभरची साथ
प्रेम म्हणजे दु:खावर मात
आणि सुखाची बरसात

मुलेबाळे थोर आणि नातवंडे
जमली सारी ईकडॆ
आनंदी आनंद जिकडे तिकडे
वारा पण सांगे चोहीकडे
की आज आहे
मम्मी आजीचा बर्थ डे..........


स्वप्नील............

आजी आजाला काठीवीना चालण्याचे आपले मनोदय सांगत असताना,ते संभाषण तानुच्या कानावर पडते.स्वपनाळू तानु दुसऱ्या दिवशी आपले स्वप्न आजाला सांगते.

आजीची काठी.

चिमुकल्या तानुला
स्वप्न पडे पाहाटेला
आजी आणि काठी
एकमेकांशी बोलताना

काठी म्हणे आजीला
नको सोडू कधी मला
संगतीत राहून तुझ्या
महत्व आलेच मला

आजी सांगे काठीला
नकोच घालू गळ मला
इतक्या वर्षाच्या सोबतीने
आला कंटाळा तुझाच मला

ऐकून त्यांच्या संभाषणाला
म्हणे तानु स्वत:ला
स्वप्नांत का असेना
पाहीन माझ्या आजीला
काठीवीना चालताना..........


स्वप्नील............


कालाय तस्मै नम:

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबुजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देयी निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहुनी सुर्याला

ऐकुनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
दोष असे हा सुर्याचा
करी तो
उदय अन अस्थ दिवसाचा

ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
दोश नको देऊं तूं सुर्याला
दोष असे हा प्रुथ्वीचा
गर,गर फिरुनी सुर्याभोवती
जन्म दिला तिने ह्या सर्वांना

पाणावल्या डोळ्याने
म्हणे प्रुथ्वी सुर्याला
भलेपणाचेदिवससंपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना

स्तिथप्रद्न्य तो सुर्यनारायण
समजावी त्या माउलीला (प्रुथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:

बैचेन अशी होवू नकोस
मन भटकू देवू नकोस
मी येतोय तुझ्या जीवनात
माझी वाट तू पाहू नकोस

रस्त्याकडे डोळे लावू नकोस
भासांच्या मागे धावू नकोस
मी करेन तुझ्या ह्रदयात प्रवेश
मला इतरत्र तू शोधू नकोस

आरशात सारखं पाहू नकोस
ओठ आता रंगवू नकोस
मी जीवनचं तूझं रंगवून टाकेन
तू शरीर आपलं रंगवू नकोस

रात्र आता जागवू नकोस
जास्त विचार तू करु नकोस
मी येईन प्रत्यक्ष समोर तुझ्या
स्वप्नात मला तू शोधू नकोस

यापुढे...
तुझ्या ह्रदयाची धडधड मी असेन
तुझ्या स्वप्नातला राजकुमार मी असेन
तुझ्या आयुष्याचा सोबती मी असेन
तू आता तू नाहीस तर मीच असेन

दोनच पावलं एकटी चाल आता...
पुढच्या वळणावर उभा मी असेन...

तू माझ्याशी लग्न करशील...
एक अनोळखी मुलगा येईल,
तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भालुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.

मान्या आहे. तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार...

तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी...
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल...
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखया म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नस मान्यता देतील...

पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी,
काय तू जीवांभरच नात जोडशिल...अग
एका हृदयाने भिकारी मुळशी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल...
तू माझ्या हृदयात राहशील...
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल...
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल...

हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील...
तरी पण............ .........
एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'

'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी

धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या

वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर

गेली वेळ निघुन आता, झाले
अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर

हवी होती फक्त दोन अक्षरं



http://i149.photobucket.com/albums/s53/mechvishnu/Animations/d1at8.gif
"Any man can love a million girls but only a REAL MAN can love one girl in a million ways....
*Love one! Be good! Live well*."
Swapnil Kumar

१४ फेब्रुवारी
व्हेलेंटाईन दिवस
तरुणाईचा दिवस
प्रत्येक मनातला दिवस
मनातल्या प्रत्येकासाठीचा दिवस

असा हा प्रेमाचा दिवस
लवकरच येणार आहे
कुणास ठाउक यावर्षी किती
ह्रदयांचा वेध घेणार आहे

पुन्हा भेटवस्तुची दुकाने
कार्ड आणि गिफ्टस् नी भरतील
कॉलेज कट्टे, बागा गुलाबी
रंगात न्हाउन निघतील

प्रत्येक जण आपला आपला प्लान
बनवत असतो आणि तो
इतरांहून कसा वेगळा आहे
हे ग्रुपला पटवुन देत असतो

यातले most प्लान
पार पडतच नाहीत
घेतलेली गिफ्ट, गुलाबे
तिला पोहचतच नाहीत

गुलाबं कोमेजतात
गिफ्ट कपाटात जातात
मनातल्या भावना
मनातच विरुन जातात

पण मित्रा हार मानु नकोस,
पुढल्या वर्षी तुझ्या हातातले गुलाब
तिच्या हातात असेल
कुणी सांगावे कदाचीत
तिच्या कपाटातही न दिलेल्या
गिफ्टची आरास असेल.........

आज तुझी खुप आठवण येत आहे...
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात, पण...पण...अश्रु येत नाही!
जशी शरीरावर ऐखादी जखम झाल्यावर, त्यावरची खपली गळूनं पडते,
पण डाग मात्र कायम रहातो, तूझ्या आठवणीची खपली कधीच गळून पडली,
पण...पण...मनावर डाग मात्र कायम राहीला. अगदी मरेपर्यन्त,
आज तुझी खुप आठवण येत आहे...
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात, पण.......पण....अश्रु येत नाही...!

"आय लव यु" बोलयचच राहतो
रेसकोर्सवर धावताना घोडा
हळुच घोडीकडे बघतो
आज रेस जिंकलो तर
डिनरला नेईन म्हणतो...

बघा दिवसा ढ्वळ्या पक्षी
पक्षीणीला साद देतो
" वाट बघु नकोस गं , चिमणे "
कोकिळेकडेच जेवणार सांगतो...

बोकोबाही चालु आमचा
चोरुन दुध पितो
हळुच दुध पिता पिता
मनीलाही चोरुन नेतो...

भुंग्यांचही बरं त्यांना
बोलायलाच कुणी नसतो
कधी जाई-जुई वर , तर
कधी रातराणी वरही बसतो...

मोतीचीच गंमत बघा
रोज मजा करतो
आज "पपीबरोबर" तर
उद्या "पिंकीबरोबर" फ़िरतो...

कसला माणूस बुद्धीमान
साला सगळीकडेच हरतो
म्हातारा होत आला तरी
"आय लव यु" बोलयचच राहतो...

मित्रापेक्षा जास्त आणि प्रियकरापेक्षा कमी,
नाही रे, तोलत नाहिये मी ही अनमोल नाती...

पण आहेस तरी नक्की कोण तू माझा,
अवचित या मोहक वळणावर भेटलेला...

गुंफलेस तू धागे विश्वासाचे,
देतोहेस साथ,पाळतोय निती नियम ही जगाचे...

केवढी आहे आपली मित्र-मैत्रिणींची फौज,
तरी कुणातही नाही अजुन ही कुजबुज...

पण ठाऊक आहे हे दोघांना,
आवडतो आपण एकमेकांना...

घेतो दु:ख वाटून,अडचणी समजुन,
नाही दुखवत भावनांना...

पाठराखण करतो एकमेकांची,
रोजच उत्सुकता संवादाची...

ना ओढ आहे ही,ना आकर्षण,
ना दिलेय मन एकमेकांना आंदण...

पण,बोलायला लागले आहेत डोळे,
मैत्रीच्या वाटेवर फुलताहेत प्रेमाची फुले...

काय आहे तुझ्या मनात,
जरा बोल तरी शब्दांत...

खुप झालाय मजेशीर हा गुंता,
व्ह्ययलाच हवा आता उलगडा...

होईल का या नात्याची उकल,
एक मात्र जरुर कर...

मित्र 'रहाच' ,बनलास जरी प्रियकर,
कारण ,आपल्या मैत्रीचे नातेच तर आहे 'खरे' अमर...

काळा रंग एकदा पांढरयावर रुसला
तू चांगला, मी वाईट , कोपर्यात जाऊन बसला
समजूत काढावी कशी पांढ़र्यालाकळेना, ..
सुटलेली मैत्री, नव्याने जुळेना....

पांढरयाचं साकड़ देवाने एकलं...
रात्रीला एकदा रजेवर टाकलं..
माणूस राहिला जागा, घुबडालाही दिसेना...
काळोखाशिवाय कोणी आणि काही मागेना...

देवानी मग एक, अजुन केली मजा...
केसांना दिली पिकण्याची सजा..
पांढरया केसांखाली सुंदर काही दिसेना...
काळे केस सोडून कुणी काही मागेना...

गंमत म्हणून त्यानी गायब केली माती..
खायला झाला कहर आणि ओस पडली शेती..
भूकेपुढे दूसरा विचार मनात टिकेना....
काळया मातीशिवाय, कुणी काही मागेना...

काळे काळे ढ़ग करून टाकले नीळे...
ओस पडला गाव, पाण्यावीना तळे...
उन्हाची धग, काहीकेल्या सरेना...
काळे ढ़ग सोडून कुणी काही मागेना...

देव म्हणाला हळूच...'मला दोडके कुणी नाहीत...
तू कुठे, कुठे आहेस तुलाच नाही माहित..
दूसरा मोठा म्हणुन कुणी इथे हरेना...
एकाची जागा कुणी दूसरा कधी भरेना'....!!!!!!!!!


एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

अशीच एक कविता झुरलेली
रात्र गहन होत जाते ना जशी
तशीच काहीशी मनात उतरलेली…
कुठुनशी एक झुळुक आलेली…
हसत हसतच एक ओळ देऊन गेली
ओलं झालेल मन माझ अजुन तसच आहे
रात्रीच्या स्पर्शात गोठलेल ते गाण
अजुनही तसच आहे..
अगदिच काही नाही
पण आपल थोड दुःख वाटुन गेली
जातांना मला बिलगून म्हणाली
भेटत जा की मधुन मधुन…
कधीतरी मन हलक करायला बर वाटत…
तुझ्या संगतीत माझ गाण बघ कस आपसुकच पुर होत
अशीच एक कविता झुरलेली..........

लहानपणापासून आपल्याला स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे सांगण्यासाठी हा श्लोक ऐकवला जातो.

“सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ”.

म्हणजे असे की जो मनुष्य सुख आणि दु:ख, लाभ आणि हानी यांना समान मानतो तो स्थितप्रज्ञ. आणि सर्वांनी स्थितप्रज्ञ असावे, हे गुण अंगात आणावेत, किंवा स्थितप्रज्ञ माणसाचा आदर्श ठेवावा असे आपल्या मनावर बिंबवले जाते. पण परवा माझ्या वाचनात गीतेतला हा पूर्ण श्लोक आला. त्यामुळे माझ्या पटकन लक्षात आले, की अपूर्ण श्लोक आपल्या पूर्ण समाजाला सांगितल्यामुळे आपले एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून अत्यंत नुकसान झाले आहे.

पूर्ण श्लोक असा आहे,

सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ

ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥

- भगवद्गिता अध्याय २, श्लोक ३८

ह्याचा अर्थ असा, “सुख-दु:ख, लाभ आणि हानी, किंवा विजय व पराभव ह्यांना सारखं मानून तू युद्धासाठी तयार हो. म्हणजे तुला पाप लागणार नाही. ” . कुरूक्षेत्रावर स्वत:चा क्षत्रिय धर्म विसरून कर्मत्याग करणारया अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण स्वत: असा उपदेश करीत आहेत की, “युद्धात होणारया निर्णयाचा विचार न करता तू फक्त तुझे कर्तव्य कर. एक धनुर्धारी म्हणून, एक योद्धा म्हणून, एक क्षत्रिय म्हणून रणभूमीवर युद्ध करणॆ हे तुझे कर्तव्य आहे. तू केवळ तुझे कर्म कर व फळ मला अर्पण कर. त्यामुळे तुला कोणतेही पाप लागणार नाही.”

आता मी असे का लिहिले कि अर्धा श्लोक आम्हाला सांगितल्यामुळे आमच्या समाजाचे, राष्ट्राचे नुकसान झाले आहे? माझे असे मत आहे, की आम्हाला असे सांगण्यात आले की जर तुम्ही सगळे सहन केले आणि तरीही मन शांत ठेवले तर तुम्ही स्थितप्रज्ञ. कोणीही कितीही आक्रमणे करू दे, कोणीही कितीही लबाडीने वागू दे, कोणीही आमच्या देशावर आमच्या संस्कृतीवर हल्ले करू दे, पण आम्ही स्थितप्रज्ञ राहणे आवश्यक आहे. जगातील इतर देश श्रीमंत झाले तरी चालतील, आम्ही मात्र प्रगतीची, समृद्धीची वाट धरू नये, कारण सुखात काय आणि दु:खात काय शेवटी स्थितप्रज्ञ असणॆ महत्त्वाचे.

म्हणून एक राष्ट्र म्हणून, भारताने भगवान श्रीकृष्णांचा हा उपदेश, ह्या श्लोकात सांगितलेला, समजून, उमजून आचरणात आणला पाहिजे. तरच आमच्या राष्ट्राची प्रगती होईल आणि एक सुरक्षित आणि समृद्ध भारत निर्माण होईल.


आय लव माय India........



आभाळ जेव्हा भरून येतं

तेव्हा माझ्याही मनात आठवणिंची काळोखी दाटते

सैरभैर होऊन मग घरटं चुकलेल्या पाखरासारखं

एकेक झाड ते शोधायला लागतं

कितीही समजावलं तरी त्याला उमगत नाही

की घरटं आता राहिलचं नाही

कालपर्यंत माझं जग होतं

त्यातलं काहीसुद्धा उरलं नाही

जाताना तू काहीसुद्धा नेलं नाहीस

म्हणालीस आता तेवढा वेळ नाही

तुझ्याशिवाय जगताना

माझ्याकडे तेवढं सोडून काही नाही

म्हणून म्हणतो परत ये

कधिही न जाण्यासाठी

किती पुरणार आठवणी

तुझ्याशिवाय जगण्यासाठी........

ठरवलं ना एकदा…

मागे वळुन पुन्हा,
आता नाही बघायचं…

विसरलेल्या आठवणींना,
आता नाही आठवायचं…

चुकार हळव्या क्षणात,
आता नाही फसायचं…

अपेक्षांचे ओझे आता,
मनावर नाही बाळगायच…

नागमोडी वळणावर आता,
नाही जास्त रेंगाळायचं…

निसरड्या वाटेवर आता,
नाही आपण घसरायचं…

स्वतःच्या हाताने आता,
स्वतःला सावरायचं…

नी स्वतःचे आयुष्य,
स्वतःच आपण घडवायचं…

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,

सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,

सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,

स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन

स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,

तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात……

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

मैत्री असावी अशी… मैत्रीसारखी

हसत राहणारी.., हसवत राहणारी…

संकटकाळी हात देणारी…

आनंदी समयी साद घालणारी…

मनाची कवाडे उघडून डोकावणारी…

काहीं गुपितांचे राखण करणारी…

मन मोकळे करुन सारं सांगणारी…

सांगता सांगता मोहीत करणारी…

कधी कुणाला न लुटणारी…

चांगल्याच कौतुक करणारी…

तितकीच चूका दाखविणारी…

शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी…,

मैत्री असावी अशी… मैत्रीसारखी

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस…
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं………….

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

कुणीतरी हव असत……
कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार
हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्….

कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार
फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्……

कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार,
चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार……..

कुणीतरी हव असत ,आपल म्हननार
नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार……..

कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,
कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार……..

कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,
कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार……

कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,
स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार………

कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार,
माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार….

कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,
माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार…..

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे

पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर पण
Movie सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
‘फ़ुलपाखरान्च्या’ सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल ?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या .

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या ,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,
गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते….
गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,
तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते….
अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात….
आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,
चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी!!!!

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

दोस्ती नाम नहीं सिर्फ़ दोस्तों के साथ रेहने का..
बल्कि दोस्त ही जिन्दगी बन जाते हैं, दोस्ती में..

जरुरत नहीं पडती, दोस्त की तस्वीर की.
देखो जो आईना तो दोस्त नज़र आते हैं, दोस्ती में..

येह तो बहाना है कि मिल नहीं पाये दोस्तों से आज..
दिल पे हाथ रखते ही एहसास उनके हो जाते हैं, दोस्ती में..

नाम की तो जरूरत हई नहीं पडती इस रिश्ते मे कभी..
पूछे नाम अपना ओर, दोस्तॊं का बताते हैं, दोस्ती में..

कौन केहता है कि दोस्त हो सकते हैं जुदा कभी..
दूर रेह्कर भी दोस्त, बिल्कुल करीब नज़र आते हैं, दोस्ती में..

सिर्फ़ भ्रम हे कि दोस्त होते ह अलग-अलग..
दर्द हो इनको ओर, आंसू उनके आते हैं , दोस्ती में..

माना इश्क है खुदा, प्यार करने वालों के लिये “अभी”
पर हम तो अपना सिर झुकाते हैं, दोस्ती में..

ओर एक ही दवा है गम की दुनिया में क्युकि..
भूल के सारे गम, दोस्तों के साथ मुस्कुराते हैं, दोस्ती में..

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री………..

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात…

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

“आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या शणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या शणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा”

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

गंध आवडला फुलाचा म्हणून… … फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे…

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं…

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं…
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं

मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी….
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

गंध आवडला फुलाचा म्हणून… … फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे…

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं…

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं…
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं

मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी….
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं

सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं

कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ

हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा

अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला

एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला…

ऍकत रहावी अशी हरीची बासरी

अस्मानीची असावी जशी एक परी…

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी

दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात

नेहमीकरता असणारी तुझीचं साथ…..

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे…

तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

बोलण्यासारखे खुप आहे, सांगण्यासारखे काहीच नाही;
करण्यासारखे खुप आहे, होण्यासारखे काहीच नाही…..

कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे, दुखण्यासारखे काहीच नाही…..

उभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसलो नाही तुला तर, बघण्यासारखे काहीच नाही…..

तुला नेहमीच वाटत असेल, मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे, कळण्यास अवघड काहीच नाही…..

माझ्या नेत्रांतील आसवांची, तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत, नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

क्यूं कहते हो मेरे साथ कुछ भी बेहतर नही होता
सच ये है के जैसा चाहो वैसा नही होता
कोई सह लेता है कोई कह लेता है क्यूँकी ग़म कभी ज़िंदगी से बढ़ कर नही होता
आज अपनो ने ही सीखा दिया हमे
यहाँ ठोकर देने वाला हैर पत्थर नही होता
क्यूं ज़िंदगी की मुश्क़िलो से हारे बैठे हो
इसके बिना कोई मंज़िल, कोई सफ़र नही होता
कोई तेरे साथ नही है तो भी ग़म ना कर
ख़ुद से बढ़ कर कोई दुनिया में हमसफ़र नही होता

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

तो मराठी मुलगा असतो !!
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वात साधा सुधा दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पन जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सिगरेट पिऊन येतात
पन जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पन जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो !! …………

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

किसी के इतने पास न जा

के दूर जाना खौफ़ बन जाये

एक कदम पीछे देखने पर

सीधा रास्ता भी खाई नज़र आये

किसी को इतना अपना न बना

कि उसे खोने का डर लगा रहे

इसी डर के बीच एक दिन ऐसा न आये

तु पल पल खुद को ही खोने लगे

किसी के इतने सपने न देख

के काली रात भी रन्गीली लगे

आन्ख खुले तो बर्दाश्त न हो

जब सपना टूट टूट कर बिखरने लगे

किसी को इतना प्यार न कर

के बैठे बैठे आन्ख नम हो जाये

उसे गर मिले एक दर्द

इधर जिन्दगी के दो पल कम हो जाये

किसी के बारे मे इतना न सोच

कि सोच का मतलब ही वो बन जाये

भीड के बीच भी

लगे तन्हाई से जकडे गये

किसी को इतना याद न कर

कि जहा देखो वोही नज़र आये

राह देख देख कर कही ऐसा न हो

जिन्दगी पीछे छूट जाये

ऐसा सोच कर अकेले न रहना,

किसी के पास जाने से न डरना

न सोच अकेलेपन मे कोई गम नही,

खुद की परछाई देख बोलोगे “ये हम नही

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही..

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही…

का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण…

मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही…

रात्री छान च असतात … तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी … मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला…

प्रेम कधी सफल होते तर कधी नाही… ते जीवनात कधी ही सब कूच नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असत…

प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही …
पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही…

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

स्वप्नील........

एकदा त्याचे आनी तीचे भांदन झाले. तो तीच्यावर रागावून बसला. तीने त्याला समजावण्याचा खुप प्रयत्न केला. पण तो काही एकेच ना! शेवटी ती रागावून म्हणाली..
मी आहे तर इतका रागावतो आहेस, मी नसेन तर काय करशील?

मी नसें तर!!!
ती: तुझ्या आयुष्यात मी नसें तर कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वतःला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमधे रमशील?
कोणाच्या ओठांवर हसू फुल्व्शील?
कोना वरून मित्रन्मधे मिराव्शील?

बयिक्ची मागची सिट जेव्हा रिकामी राहिल,
समोरचा आरसाही जेव्हा माझी वाट पाहिल,
ट्राफिक चा घोंगाटही जेव्हा क्षुल्लक वाटेल,
ती १० मिनिटेही तापासराखी भासतील,
संग तेव्हा काय करशील?

कामात बुडवून जरी घेशील स्वतःला,
माझी आठवण येताच…
मोबाईल वर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नहीं…
तुला कहीतरी चुक्चुक्ल्यासराखे नक्की वाटेल…
संग तेव्हा काय करशील?

दिवस भर दुसर्यांच्या चानाक्स्श नजरेंपासून लपशील..
उगाच किनार्यावर माझी वाट बघशील..
संध्याकाली हुरहुर्शील…
माझ्या आठवणी ने बैचेन होशील..
पण अलगद आपले दुःख पीउन टाकशील…
मावलत्या सुर्याला आपल्या अश्रुंचे अर्ध्य देऊन…

गर्दीतही एकटा राहशील,
पुन्हा पुन्हा मागे पाहशील,
मी नजरेस पडणार नहीं…
हताश होउन जड़ पावलांनी पुढे चलशील..
तू ही त्याच गर्दित हरवून जाशील… कुठेतरी…

तू लाख स्वतःला रमवशिल,
दुसर्याँमधे स्वतःला हरवशील…
नविन नात्यांना जोदशील…. पण..
खरचं सांग…..
“काय मला विसरु शकशील???”

स्वप्नील........

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?


स्वप्नील........

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेलशरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे

मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे

मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

स्वप्नील........

सप्तसुरांची उधळण करीत...
सुरांगणा घेवूनी आली..
चातकासारखी वाट पाहत होतो आम्ही...
अन तु तर एक श्रावणसरी सारखी चिंब बरसली...

हसणं तुझं आहे कीती अवखळ...
गालावर पडते ती त्याचीच सुंदर खळ...
तुझं वागण आहे किती सरळ...
जशी मत्स्यकन्या पाण्यामधे हळुवार तरळ...

नयन तुझे किती आहे प्रेमळ...
एकटक पाहता मग पडते तुझी भुरळ...
अशी आहेस तु जशी तळ्य़ात...
लाटांवर डोलते राजहंसिनी निर्मळ...

तुझ्या मधुर वाणीचे
करावे तितके कौतुक कमीच
हळुवार पुटपुटलीस जरी...
त्याला लाभलीये मधाची गोडी भारी...

मनं तुझं आहे खुप उदार
देतेस आपल्या परीने तु इतरांना आधार...
तुझ्या या चांगुलपणाचा...
होतो सगळीकडे जय जयकार...

गर्वाला तुझ्या दुनियेत...
काडीमात्र स्थान नाही...
प्रेमाचं रान मात्र
कुठेही रिकामं नाही...

अशी आहेस तु...
सुखाचे करतेस दान भरभरुन
अन दु:खाचे डोंगर मात्र
सहन करतेस स्वत:हून...
अशी आहेस तु...

तू विसरु शकशिल का?

ते गोड क्षण,
माझं हळवं मन;
तुझी अखंड बडबड,
आणि माझं नि:शब्द मौन.
तू कसं विसरु शकतेस?

तूझं मुग्धपणे हसणं,
हसताना मोहक दिसणं;
तुला डोळ्यात साठवताना,
माझं भान हरपणं.
तू कसं विसरु शकतेस?

तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,
घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;
तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,
माझं तुझी समजुत काढणं...
तू कसं विसरु शकतेस?

आपलं ते चांदण्यांखाली जागणं,
तुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;
जन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,
तुझा हात माझ्या हातात गुंफणं...
तू कसं विसरु शकतेस?

माझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,
तुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;
तरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,
माझं रात्र रात्र जागणं...
तू कसं विसरु शकतेस?

तू कसं विसरु शकतेस;
माझं प्रेम,
माझ्या भावना,
माझं मन,
माझ्या वेदना...
सांग, तू विसरु शकशिल का?


होतो मी बेभान जेव्हा नसतेस तू

डोळे सुखावतात जेव्हा दिसतेस तू

तसा आहे मी फार बोलका
पण निशब्द होतो
जेव्हा समोर असतेस तू

तसा आहे मी हसतमुख
पण होतो चिंतित
जेव्हा दुखी असतेस तू

तस मी सहज कोनाच ऐकत नही
पण कटाक्षाने शब्द पाल्तो
जेव्हा काही सांगतेस तू

माला सवय खोड्या करायची
करता तुझी चेष्टा रागावतेस तू
पण काय सांगू
रागत किती गोड वाटतेस तू

तस मी खेळतो जिंकण्यासाठी
पण वाटत रोज़ हराव
जेव्हा प्रतिस्पर्धी असतेस तू

तस मी कोणाला काही मागत नाही
पण आज तुझ्या जवळ मागतो
एक प्रश्नाचा उत्तर
काय माझ्यावर प्रेम करतेस तू ???????

*********************************

काश असे असते तर .............

काश ................

आपला,
स्वप्निल.....

प्रेम हे लिहून वाचून समजत नाही
त्यासाठी भावना जीवन्त हव्या......




एक लघु कथा, मला आवडली म्हणुन तुमच्या साठी.....


सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.




http://i149.photobucket.com/albums/s53/mechvishnu/Animations/d1at8.gif
"Any man can love a million girls but only a REAL MAN can love one girl in a million ways....
*Love one! Be good! Live well*."
Swapnil Wakchaure...

असते मतलबी, दुनिया ही सारी,
पण आपले, निराळे, असतातही काही,
दैव ज्यांची, सतत परिक्षा पाही,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

जिथे असते श्रद्धा आणि भक्ति,
असे पुजनिय, असतात काही व्यक्ति,
क्षणिक असते, अबोल्याची सक्ति,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती,
कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती,
मनास होत नाही, कधी येथे क्षिती,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

इथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी,
विसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी,
आठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी............

कुणीतरी असलं पाहिजे...
कुणीतरी असलं पाहिजे...
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना
“लवकर ये” असं सांगायला...

मीटिंग मधून बाहेर आल्यावर
“back” असा मेसेज टाकायला...
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला...

इच्छित स्थळी पोचल्यावर
“सुखरूप पोचले” चा फोन करायला...
ट्रेक साठी जाताना “फार भिजू नकोस”
असं बजावायला...

उशीर होत असेल, तर
“जेवून घ्या” असं सांगायला...
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं थांबायला...

घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला...
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला...........

तिच्याविना आहे माझी प्रत्येक मैफ़ल सुनी .
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

सांगायाचे आज तिला मी रोज ठरवतो ,
पण ती येता समोर मजला घामच फ़ुटतो .
ओठावरचे शब्दही जाती ओठांतून परतुनी..!
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?
तिचे बोलणे फ़क्त वाटते ऐकत राहावे .
तिने हासता तिच्या गालची खळीच व्हावे .
तिने आणि तिनेच यावे माझ्या स्वप्नातुनी..!
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

तिच्याविना आहे माझी प्रत्येक मैफ़ल सुनी .
कधी वाटते असतील आमुची जिवलग नाती ,
कधी भासते कुणी दूरची अनोळखी ती .
उगाच मजला छळण्याची की खोड तिची ही जुनी..!
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

तिलाही कळते सारे मजला ठाऊक आहे
खात्री नाही तरीही आशा अंधुक आहे
भाव मनीचे आज ना उद्या घेईल ती समजुनी..!
तिला सांगितलंय का कुणी ?
तिला सांगितलंय का कुणी ?

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend ।
आयुष्यभराचं नातं हवं,
देव करो तीच्याकडूनचं,
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी

मला जरा सावरू तर दे..
मग लिहीन की कविता..

अजून कुठे रात्र पुरती हरल्ये
अजून कुठे तहान पुरती सरल्ये
अजून एकदा तुला डोळ्यांनी पिऊन घेऊ दे..
मग लिहीन की कविता..

अजून उजाडलेला नाही उद्याचा दिवस
अजून पुरता फिटायचाय बोललेला नवस
अजून एकदा जीव ओवाळून टाकू दे..
मग लिहीन की कविता..

अजून श्वासांत माझ्या तुझे श्वास दरवळतायत
अजून स्पर्शात तुझ्या कोवळी फुलं चुरगळतायत
उद्या श्वासांचे ध्यास उरतील.. स्पर्शांचे नुसतेच भास उरतील..
अजून काही क्षण जगून घेऊ दे..

बोलताना जरा सांभाळून....
शब्दाला तलवारीपेक्षा धार असते
फ़रक फ़क्त एवढाच की,
तलवारीने मान तर
शब्दांनी मन कापले जाते

जरी तलवारीच्या जखमेतून रक्त
आणि शब्दांच्या जखमेतून अश्रू
येत असले तरी,
दोघांपासून होणारी वेदना मात्र सारखी असते.

म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून.........

शब्दच मानसाला जोडतात
शाब्दच मानसाला तोडतात
शब्दच रामायण आणि महाभारत घडवतात........

तुझ्या एका शब्दावर
माझे सर्वस्व अवलंबून आहे
तुझ्या एका शब्दावर माझे हसने
आणि एका शब्दावर रडणे आहे

म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून.........
शब्दाला तलवारीपेक्षा धार असते

So...............

......बघ माझी आठवण आलीच ना....??
आज त्याचा वाढदिवस,
तो तुला होटेलात नेईल.......बघ माझी आठवण येते का....??

खिशातून एक चॉकलेट काढून देईल
त्याचा कागद उघड,
अलगद दोन तुकडे कर,
एक त्याला दे, एक तू खा
तो म्हणेल....नको
तूच संपव, तुझ्यासाठीच आहे......बघ माझी आठवण येते का....??

तुझ्यावाटणीचा चॉकलेट खाशील
अर्धा उरलेला पर्स मध्ये ठेव
काय हे.....तो म्हणेल,
किती कचरा जमवतेस
असुदेत.....आधीच्या चॉकलेटचे कागद
तो हसेल, म्हणेल वेडी कुठली......बघ माझी आठवण येते का....??

तो विचारेल काय खाणार
तू म्हण वोटरमिलन ज्यूस,
तो रागावेल,
वेज क्रिस्पी आणि ज्यूस ऑर्डर करेल
आलं की थोडंसं खा,
जबरदस्ती त्याला संपवायला लाव.......बघ माझी आठवण येते का....??

तो मल्टीप्लेक्स मध्ये नेईल
त्याला हिंदी फिल्म पहायची असेल,
तू इंग्लिशच्या तिकीट काढ
तरी तो येईल, बसेल गप्प
पॉपकोर्न आण, त्याला दे तू खा
चायला काही समजला नाही म्हणेल.......बघ माझी आठवण येते का....??

घरी ये, तो आणि तू
बेडरूम मध्ये जा,
पर्स मधला चॉकलेट काढ,
हळूच त्याला sms कर
तू दिलेला चॉकलेट मी खातेय,
तो हसेल....तू ही हस..........बघ माझी आठवण येते का....??

तो म्हणेल, वेडी रे वेडी
आज तोच दिवस,
तेच सर्व, छान होते ते दिवस
आत्ता धावपळ, काम.....
तरी तू आहेस माझ्याजवळ
तो तुला कुशीत घेईल, अगदी तशीच.......बघ माझी आठवण येते का....??

तू त्याला मिठी मार,
एकदा त्याच्या डोळ्यांत बघ,
थोड़ीशी हस,
आजही त्याला तू तितकीच आवडतेस
तो गालावरून बट कानामागे टाकेल
डोळे मिट.....अलगद स्वप्नात रमून जा.......बघ माझी आठवण आलीच ना....??

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी...................



प्रश्न माझ्या मनास भेड़सवतो, उसळ्या मारतो
कि माझ्या आयुष्यात येणारी
माझ भाग्य ठरवनारी कशी असावी

ती सुंदर रूपवती नस्ली ज़री
तरी सुंदर विचार करणारी असावी

दृष्टि दोशामुले चश्मा असला ज़री
चांगला दृष्टिकोण ठेवणारी असावी

नोकरी केलि किव्वा नही तरी
संसाराकडे बारीक लक्ष्य देणारी असावी

यशामधे माला ठेवेल ज़मिनिवारी
अपयाशात आत्मविश्वास वाढवनारी असावी

माझे आई-बाबा सासू-सासरे असले ज़री
त्याना स्वतः चे आई-बाबांचे प्रेम देणारी असावी

दुःखाचे सावाट कधी ओढ़ले ज़री
माझी सावली बनून राहणारी असावी

आयुष्य लाम्ब असल ज़री
माझ्या जगण्याला कारण देणारी असावी

तुमचा काय विचार आहे????



आपला ,

प्रेम हे लिहून वाचून समझत नाही
त्यासाठी भावना जीवन्त हव्यात

दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

Swapnil..........

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत.............

असाच आहे मी...
चांदण्यांबरोबर रात्री गप्पा मारणारा
वाऱ्याबरोबर दुर
फिरायला जाणारा
हिरव्या सावलीत
कोठेतरी रमलेला
असाच आहे मी
कवितेतल्या चारओळीत
कोठेतरी हरवलेला

मला मी सांगू कसा वाटतो
थेंब थेंब जसा रोज साठतो
शब्दास शब्द, हाकेस हाक, कधी नि:स्तब्ध राहतो
जीवनपूजेचा रोज असा मी प्रसाद वाटतो

टाळीला जेव्हा टाळीही मी देतो
खांद्यालाही खांदा सहज मी जुळवतो,
कमवून मित्र अनेक, कधी एक गमवतो
तेव्हा ओढ्यात बसून डबक्यात पाहतो

मला मी सांगू असा वाटतो ...

कधी कुणी भावनांचा वसंतही देतो
तरी पालवी फुटता, मी मैत्रीतच खुजतो
कधी डोळ्यात नकार साचतोच फार
तेव्हा बरसूनी, इंद्रधनु दिसल्याचा आव आणतो

मला मी सांगू असा वाटतो ...

रोज स्वप्नांच्या यादीसवे मी निघतो
काही गाठतो,काही खोडतो,काही पुन्हा लिहीतो
आणि सायंकाळी मात्र मी एकटाच उरतो...
अरे कारण तो एकांतही मला उपभोगायचा असतो...आणि काय...

आणि खरच असाच आहे मी....

"Any man can love a million girls but only a REAL MAN can love one girl in a million ways....
*Love one! Be good! Live well*."
SWAPNIL WAKCHAURE
+91-9833776399

कविता लिहिणे सोपे
समजावणे जड असते...

मनातील भावनांचे
व्यक्त करणे अवघड असते...

बोलणे सोपे जरि
शब्द सापडणे जड असते...

मी बोललो काही
तिला समजणे अवघड असते...

स्पर्शाने केल्या खुणा
ओळखणे जड असते...

मी केला स्पर्श तिला
तिचे थांबणे अवघड असते...

आता तिलाच कळु देत
प्रेम माझ्या मनीचे...

मी सांगणार नाही
मी किती प्रेम करतो तुझ्यावर...आणि कधी समजवणारही नाही...बघुया कधी समजतेस ते.

तुला मानवेच लागेल
माझे मन मला सांगतय
तुला यावेच लागेल...
ठरव किती ही काही ही तू
तुला यावेच लागेल...
प्रेम आहे तुझे माझ्यावर
तुला मानवेच लागेल
वेडा झालोय तुझ्या प्रेमात
तुला समजून घ्यावेच लागेल...
लाख खोटे नकार दे तू
पण तुला हा म्हणावेच लागेल
प्रेम जर माझे खरे आसेल
तर तुला झुकावेच लागेल...
माझे मन मला सांगतय
तुला यवेच लागेल...
नाही जर आता आलिस
आयुष्य भर पाछ तावा लागेल
मी तर एकदाचा संपून जाईल
तुला रोज मरावे लागेल...
सकाळ संध्याकाळी आठवणीत माझ्या
स्वताला जळावे लागेल...
माझे मन मला सांगतय
तुला यवेच लागेल
प्रेम माझे खार आहे
तुला मानवेच लागेल...


नशीबचा खेळ
सार काही करविते ते
क्षणात सार बदलविते ते
अपेक्षा नसताना ही देत ते
हातातले हिस का उन नेते ते
म्हणतात याला नशीबचा खेळ
जमत नाही जिथे कशयाचाच ताळमेळ
आपल आपल म्हणणारा पाठीत घाव घालतो
अनोळखी येऊन हळू च मलम् लावतो
भान विसरून सारे ज्याच्या मागे धावतो
मूर्ख म्हणून तोच किमत आपली सांगतो
नाही समजत ती कधी कोणावर आनेल कशी वेळ
म्हणतात याला नशीबचा खेळ
जीवभावाचा क्षणात जिवावर उठतो
जपत आसतो ज्यासाठी तोच ते लुटतो
बरोबर वागूण ही चुकच आपण ठरतो
नाही सुटत सहजासहजी याने विणलेला पीळ
म्हणतात याला नशीबचा खेळ............

दोन घरं मी स्वत:ची
एक ते लाटेत कोलमडलं
आणि दुसरं ते वाहुण गेलं
काय दोष द्यावा त्या लाटेला ?
वाळुवर घर बनवणं
ही गोष्ट्च मुळ चुकीची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

श्रावणात बहर आला
अख्या रानाला पण
एक कळीही ना
उमलली माझ्या अंगणाला
माझ्या अंगणात होते
हिच चुक का त्या रोपांची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

चमकत्या त्या वस्तुला
मी नेहमीच सोनं मानलं
समजाऊनही न बदलली
नितीमत्ता माझी
हाव होती तेव्हा मला
त्या चमकत्या सोन्याची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

आता सगळं संपलय,
उठलाय सगळा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
मजेत आता माळ आसवांची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

पाहतोय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार नाही
कुणाच्याही साथीची
कहाणी ही एका वेडया मनाची ........................

तुझी वाट पहातोय
तुझी वाट पहातोय..............

आयुष्यात माझ्या केव्हा येशील
चंद्र तारे सोबत घेऊन,
वेडयासारखा प्रत्येक वळणावर
तुझी वाट पहातोय मन तुला देऊन.

माझ्या वेडया मनास कधी ओळखशील
माझ्या भावनांना कधी समझुन घेशील,
प्रेमाला माझ्या कधी साद देशील
तुझी वाट पहातोय कधी होकार देशील.

माझ्या प्रेमाची तुला जाणीव असतानाही
का अशी परक्यासारखी वागतेस,
हक्क माझ्यावर गाजवतानाही मनापासुन भेटायला
तुझी वाट पहातोय सांग कधी येतेस.

ओठांवरील शब्दांना बोलकं केलं तुझ्या नयनांनी ,
घायाळ केलं मला तुझ्या ओठांवरील् शब्दांनी,
कधी येतेस भेटायला चेहरा खुलवुन निरागस भावनांनी,
तुझी वाट पहातोय ये भेटायला हळूवार पावलांनी...
तुझी वाट पहातोय..............

हवी होती फक्त दोन अक्षरं

पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'

'म' म्हणजे मन माझं

'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी

धुंद अश्या मना माझ्या

लागली आस प्रेरणेची तुझ्या

वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं

जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर

गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर

दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर

हवी होती फक्त दोन अक्षरं...........

स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना ...
प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते ...
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले ...
अंतर नेहमी वाढत जाते ...

मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही ...
त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत नाही ...
हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ...

आज आशा वाटेवर मी उभा आहे ...
समोर काहीच दिसत नाही ...
पण मागे फिरावे की नाही ...
हे ही समजत नाही ...

पण या वाटेवर चालत राहण्याचा ...
मी प्रयत्न करेन ...
तुझ्या सोबत न रहता , तुझ्या
मानत राहण्याचा प्रयत्न करेन ...

मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे ...
यात आकर्षणाचा भाग नाही ...
पण कर्ताव्याची जान आहे हे ही खर ...
माझे जीवन तुला कधीच विसरणार नाही ...

चल हे आयुष्य..तू तुझ्या मना प्रमाणे जग ...
पण येणारा जन्म हा फक्त माझ्या साठी राखून ठेव ...
पण पुन्हा असे का वाटत की कोण जाणे ...
दूसरा जन्मच नसेल तर कोण जाणे ..

तुझा प्रत्येक वार
मी मोठ्या आनंदाने सहला आहे
आणि आता तुझा आवडता शब्द
"नाही" हाच माझ्या जीवनाचा भाग बनला आहे
कारण...

तुला दुसर्या कोणाच्या जवळ जातांना पाहून
माझे मन कधीच दुखणार नाही...
तू कितीही सुंदर दिसत असलीस
तरीही मी तुझ्याकडे पाहणार नाही...

तुझ्या त्या गोड हास्याला व इशार्यांना पाहून
मी चुकुनही भूलणार नाही...
माझ्याकडे कितीही वेळ असला
तरीही मी तुझी कधीच वाट पाहणार नाही...
मित्रांमधे गप्पागोष्टी करतांना
तुझा विषय मी कधीच काढणार नाही...

एकटेपणात आणि एकांतात बसून
मला तुझी कधीच आठवण येणार नाही...
तुझ्यासमोर येतांना व चालतांना
माझे पाय आता कापणार नाही...
तुझ्या डोळ्यांशी बोलायला
माझे डोळे आता तयार होणार नाही...

तुझ्याबद्दलचे माझ्या मनातील कोड
सोडवण्यासाठी मी आता प्रयत्न करणार नाही...
माझ्या जीवनातील थोडासा वेळ घेतल्यबद्दल
मी तुझ्यावर कधी रागवणार नाही...
तुझ्याशी परत बोलायला येऊन
मी माझ्या भावनांचा खेळ होऊ देणार नाही...

तुझे असे असाधारण वागणे
माझे लक्ष वेधून घेऊ शकनार नाही...
माझे सर्व रस्ते आणि वाटा
तुझ्या रस्त्यन्शि कधीच मिळणार नाही...
किती काहीही झाले तरी
माझ्या मनात तुझा विचार परत येणार नाहि ...

मन वेडं झालं आहे
प्रेमात जगताना
मन वेडं झालं आहे
तुझ्या खट्याळ गोष्टी पाहताना...

आज त्रस्त मी झालो
तुझ्या 'अशा वागण्याला... '
आज त्रस्त मी झालो
तुझ्या 'तशा पाहण्याला... '

" हा मुलगा असा कसा...,
आणि तो कित्ती छान ...'
तुझ्या अशा बोलण्यावर
मी हरवून बसतो भान

मग मी त्रस्त होतो,
तुला नको ते बोलतो...
माझ्या रागावर हसतेस ,
आणि तु मला अजुनच छलतेस...

बऱ्याच वेळेला तर
खुप शब्दफेक होते
तुझे आणि माझे भांडण
नंतर अजुनच रंगते...

भांडणाचा हा रंग
उग्र होत असताना
आपल्या दोघांनाही
इतरत्र भान नसताना
तु मला अगदीच
निःशब्द करतेस
तुझं म्हणणं माझ्यावर
उगीचच् लादतेस...

क्षणात जवळ घेवून तु
आपल्यातली तेढी मितावितेस
माझ्या मनातही नसताना अचानक
तु ' SORRY' म्हणतेस...

पण आजकाल असकाही कधीकधी वागतेस...आणि जरा जास्तच भाव खातेस...
Sametime बज़्ज़ करून...न बोलण्यांची धमकी देटेस...
आणि मनात मात्र जरा जास्त च खुश होतेस...

आपल्या ह्या भांडणातल्या प्रेमावर ,
मी खुप प्रेम करतो, आणि तू ही करत आसशील...
ही भांडणं अशीच राहू दे...

तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस
तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे

फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस

एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही

मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही

मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस

मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस

बरंच काही निघून गेलयं
तरीही मी उभाच आहे
अर्थ सर्वच संपून गेलाय
तरीही जीवन सुरुच आहे

वेळ केव्हा निघून गेली
मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा
हाती काहीच उरले नाही

आता सर्व शांत झालयं
वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता
श्रावणानंतर होत तसं

तरीही,

बरंच काही शिल्लक आहे
अजून माझ्या हाती
काही शण अजूनही आहेत
फक्त माझ्यासाठी

त्यावरच तर जगतो आहे
हसतो आणि रडतो आहे

एकच गोष्ट फक्त मी
माझ्याकडची हरलो
प्रत्येक शणी आजही मी
फक्त तुझ्यासाठी झुरलो

आजही मला एकच फक्त
सांगावेसे वाटते
आयुष्याच्या या शणीही
तुझी उणीव भासतेय
तुझी उणीव भासतेय...........

About this blog

About Me

• » ι ℓσνє мυѕι¢,ѕнαソαяι,gαzαℓѕ,ѕмѕ,ρσєтяソ &αмρ; мαкє @ ηєω ƒяιєη∂ѕ... « •

Member

Blog Archive

Blog Archive