1. अस्तित्व
स्वप्नांच्या ताठा(टा)त माहीत नाही काय आहे
पहाटेला प्रखराचा निर्सगाचाच शाप आहे
संध्या जरी काळोखात बुडली तरी
खरयाखुरया अस्तित्वाला त्याचीच प्रबळ साथ आहे
2. शाप
जगणे हा एक शाप आहे
मरण्याआधीचा व्याप आहे
भावनांच्या गुंतागुंतीत जिथे
पहिला आणि शेवटचा श्वास माफ आहे
3. निमित्त
आयुष्याच्या सुरवातीलाच
मी आज निकामी ठरलो
साला बाम्ब(bomb)येऊन अंगणात पडला
आणि मी मात्र निमित्त ठरलो
[मुलाच्या मनातील विचार मांड्ण्याचा प्रयत्न....]
नाही गं वेडे.....चुकीचा समज आहे हा
जवळून जर पाहीलंस तर अस्तित्वाचा खेळ आहे हा
डोंगर असो मग.. अश्रुंचे गर स्वप्नांचे
चिंब माझ्या वर्षावाने..डोंगरही फुलवतील त्यातूनही झरे
आज उद्याच्या खेळामध्ये..भविष्यफुले परी उमलतील
विझवलेल्या डोळ्यांचे पाणी..शतपटींनी अंकुर रुजवतील
असेलच जर विश्वास अजूनही..वाट आहे काही क्षणांची
अजून काहीच थेंब थांब..येतोच आहे मी तिथे
तुझ्यामाझ्यातील अंकुराचे, हेच तर राणी रुजणे..
हेच राणी रुजणे
ती
ती अशी आली जीवनात की
डोळे माझे बोलके झाले
तिने हसून डोळे झाकले आणि
आज त्या सूर्यालाही बुडवणे कठीण झाले
क्षुद्र
आज मज आकाश भासे क्षुद्र
सारा आसमंत परी खिशातच माझ्या बंद
त्या तिथल्या ग्रहावरती भेटलाय एक सोबती
माझे सारे उरले क्षण आता त्याच्याच सोबती
....... आता त्याच्याच सोबती
नाते कसे असावे???
प्रश्न तर कठिण आहे....
पण जे कठिण आहे....
त्यालाच तर आपण आधी संपवतो
मग याचे असे का?
का ते लांबचे चंद्र सूर्य जवळचे वाटतात?
कधी चॊथ्या सीटवरचा म्हातारा जवळचा वाटला का...
तेव्हा'भावनांचे नात'नाही का आठवत..
अठराव्या वर्षी मत देतांना भ्रष्टाचाराचा राग आला होता...
पण पासपोर्ट काढतांना तो का गिळून र्निलज्य झालात..
तेव्हा अठरा वर्ष शिकलेलं'तात्विक नातं'नाही का आठवलं..
लहानपणी शाळेत केली होती झाडलोट मनापासून..
पण आता भर रस्त्यात थुंकतांना नाही का लाज वाटत
तेव्हा वर्गमित्रांसोबत घालवलेलं'स्वछतेचं नातं'नाही का आठवत...
म्हटलं तर सगळं सोप्प आहे अनुभवला तर स्वर्ग आहे...
म्हणूनच हल्ली मला नातंच पटत नाही..
आपल्याच घरी कोंबडी पाळूनतिचं मटण खाणं पटत नाही..
तरीही मित्रांनो,
प्रश्न मात्र तसाच राहतो
नाते कसे असावे???
नाते असावे प्रेतासारखे
वाटेत फुलं पसरत जाणारे...
नाते असावे फुलासारखे
तोडल्यावरही तीन दिवस आपल्याला हसवणारे...
आणि नाते असावे वाळवंटासारखे
दिवसा वेगळे आणि रात्री वेगळे वागवणारे...
पुन्हा ही एक नवी कविता.......! मैत्रीवर....!
मैत्री.....!
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...
कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.........
माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...
सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.....
कोऱ्य़ा माझ्या आयुष्यात मैत्रीचे चित्र तू चितारले,
प्रेमाच्या सप्तरंगात ते चित्रही नाहून निघाले...
पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..
जीवनाच्या चित्रपटलावर वेगळेचं रंग रंगवणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी......
"mind manifests itself as
the stream of consciousness"
पूस्तकातली व्याख्या घोकून,
जेव्हा पूस्तक बाजूला ठेवलं..
आणि खिडकीतून बाहेर पाहीलं..
चांदण्यांनी भरलेलं आकाश दिसलं..
एकेक चांदणी गलोलीने पाडावी वाटली..
आणि कळलं पुस्तकाच्या व्याख्येच्याही..
पलीकडॆ आहे वेडं मन !!
कधीतरी वाटतं, मोठ्याश्या oysterमध्ये,
वाळूसारखे अलगद शिरलो..
तर आपला पण मोती होईल?
कधी कधी वाटतं..
जगातली सगळी फ़ुलं,
पांघरली ...
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा कोणी आयुष्य बनत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा त्याच स्वपनात ही येन असत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा घोल्क्यात लक्ष फ़क्त त्याच्या कड़े असत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा मन त्याच्या विचारात रमत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा मैत्री पेक्षा काहीतरी अधिक हव असत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
रोजच्या गप्पांच रूप बदलत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
येताच तो समोर लाजायला होत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
वाचताच ही कविता जेंव्हा कोणीतरी आठवत
एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी............ ......... ....
भरल्या जखमेवरची खपली
काढावीस असेच तू
जिवघेणे बोललीस अन्
मनाचा कोपरा ढासळला !
गच्च भरले घर
पाखराने एक एक पंख
गाळावे तसे
विलग झाले,
तू सारवलेली भुई माती लिंपल्या भिंती
सगळच कसं दुरावलं
आता तू माझ्यावर सगळा
भार टाकून
सतीच्या व्रुन्दावनापाशी
जाऊन बसू नकोस !
परंपरांचे ओझे अन्
संस्काराचे जोखड वागवत
तू काळ्याचे पांढरे केलेस,
कुंकू हरविले तरी तू
अबीर कपाळी लावून
विठ्ठलाला आळवत राहिलीस
माझे माऊली ! माझे माऊली !
तुला एकच सांगतो
मला माझ्या वाटे चालू दे !
वांझोट्या वारशाचे ओझे
माझ्या शिरी देऊ नकोस
माझे माऊली !
अश्या वंशाला वाढविण्यापेक्षा
तू पंढरीची वाट चाल
मी पडक्या वाड्याच्या प्रवेशद्वाराची
पायरी होऊन इथेच राहीन !
तुझ्या त्या असाध्य आजारात
मी पण मरत होतो तुझ्या बरोबरच
कणा कणाने .. क्षणा क्षणाने
तेव्हाच ठरवल होत..
ताजमहाल बांधून दिखवा करण्यापेक्षा
सरळ तुझ्या मागेच चालत जाव
पलीकडच्या आकाशात
पण अगदी शेवटच्या क्षणी
तू दिलेली शपथ ... 'माझ्या साठी जग'
आणि निघून गेलीस .... एकटीच ...
तसा मी अजुन जिवंत आहे ग ...
पण काय होत माहितीये
तुझ्या शिवाय ईथे जगता येत नाही
अन् .. तुझ्या शपथे साठी .. मरताही येत नाही
मी माघार घ्यायला शिकलोय
पिउन तुझ्या आठवानिना
या डोळ्यातल्या आश्रुना
जागा देऊन शकलोय
मी माघार घ्यायला शिकलोय
ह्रुदयाचे झाले तुकडे
प्रेमाच्या वलवंटात इकडे
ते वेचायला कंटाळलोय
मी माघार घ्यायला शिकलोय
हजारदा येउदे समुद्र लाटा
त्याचीच एक झालोय छटा
कण कण आता विराघळलोय
मी माघार घ्यायला शिकलोय
झगडत नहीं कलोकाशी
स्वतहाला त्याच्या कुशी
सामावून जायला निघालोय
मी माघार घ्यायला शिकलोय
तोडून आनायाचे होते तारे
आकाश झाले रीते सारे
एक टक बघत बसलोय
मी माघार घ्यायला शिकलोय
सारीपाट हा जीवनाचा
कस काय मोडायचा
आठवनिना तुझ्या मुकलोय
मी माघार घ्यायला शिकलोय.........