मराठी कविता.....• » мαяαтнι ρσєм « •

आपल्या कविता (एक संग्रह) !! इत्यादी !!!!!!!

नुकतीच पहाट झाली होती. शांत वातावरण थंड हवा होती. आईनं हलकेच त्याला उठवल.
तो उठला.बालक उमललं.गोंडस गोबर्‍या चेहर्‍यावर त्यानं पाणी मारलं.
आन्हिकं उरकली . केस चापुन्-चोपुन लावले भांग पाडला. आईला त्यानं 'टाटा' केलं
हातात
सत्य घेतलं आणि शाळेसाठी म्हणुन निघाला, गाणी म्हणत,
आपल्याच नादात गुणगुणत. अगदि आनंदात आणि "स्व" च्छंदात. मूर्तिमंत ते बालपणच होतं ,
निरागसता होती ती निसर्गात उमललेली.
आनंदात बागडत चिखलात,कमळावर उड्या मारत,रस्त्यात आवडेल त्या फुलाला हात लावुन पहात तो बालक निघाला.
त्या निरागसतेत स्वच्छ-अस्वच्छ गोष्टीच नव्हत्या. होतं ते निष्पाप, पवित्र बालपण.

हातात सत्य घेउन तो बालक पोहोचला थेट बाजारात्.दुकानात मांडलेली सुंदर खेळणी घ्यायची त्याला इच्छा झाली.
पण दुकानदारान हटकलं."काय रे हवं तुला?" असं विचारलं.
"खेळणी" बालकानं उत्तर दिलं.
"पण मग तु काय देणार मला त्या बदल्यात? काय आहे तुझ्याकडं?" दुकानदारानं सवयीनं विचारलं.
"हे घ्या. हे सत्य आहे माझ्याकडे." बालक बोलला.
"अरे हट्... हे कुठं विकुन पैसे मिळवता येणारेत? ह्याची कुठं बाजारात किंमत आहे ?" दुकानदाराचा चेहरा काळवंडला.
वैतागुन त्यानं ते सत्य दिलं फेकुन्.आणि बालकानं...
...

आपल्याच आनंदात जाउन ते सत्य उचललं. आनंदात, स्वच्छंदात त्या सत्याशी खेळत खेळत तो पुढे निघाला.
कसला अपेक्षाभंग नि कसलं काय? नुस्ता आनंदाचा प्रवास तो. मनात होतं हसु आणि हसुच.
त्याला थोडासाच पुढं गेल्यावर दिसला तो जाणारा एक ग्राहक.
खांद्यावर बारा हत्तींचं ओझं टाकल्यागत त्याचा चेहरा होता.
बालकानं त्यालाही विचारलं "हे घेनाल का? ते देनाल का?"
एवढ्या दगदगीतही एक हसतमुख चेहरा पाहुन ग्राहकालाही थोडं बरं वाटलं. तो म्हणला :-
"हे आहे तर छान बेटा.पण ह्यानं कुठं माझं उपाशी पोट भरतं? ह्यानं कुठं सुरक्षितता मिळते?"
बालकाला ह्यातलं काहिच कळलं नाही.त्यानं हातानं टाळी वाजवुन एक उडी मारली. आणि पुढं चालु लागला.

पुढं भेटला एक शिष्ट माणूस,सुट्-बूट्-हॅट् असा टकारान्त त्रयीचा पोषाख करुन. चार-पाच लोक त्याला सुरक्षा देत जात होते.
तो उद्योजक फोनचर कसलिशी "डील" करत होता.त्या तजेलदार,काहिशा आकर्षक व्यक्तिमत्वाकडे तो आपोआप ओढला गेला.
मुलापाशी जाउन त्याच्यशी थोडं खेळला.मग जाउ लागला. मुलानं त्यालाही हातातलं सत्य दाखवलं.
उद्योजकानं ते काळजीपुर्वक पाह्यलं.पण ह्याचं घाउक उत्पादन होउ शकणार नाही.थोड्याशा नाराजीनच त्यानं ते परत बालकाला.
डोक्यावर टपली मारली, आणि टाटा करत निघुन गेला.

तेव्हढ्यात आला एक वेडसर,विरह-व्याकुळ इसम, अर्धवट दाढी वाढवलेला,अस्ताव्यास्त, आणि नशेत धुत्त.
त्यानं बालकाच्या हातुन ते काढुन घेतलं आणि विचारलं "ह्यानं माझी प्रेयसी परत मिळेल?"
आणि पुन्हा थोड्या वेळानं "नाही" असं स्वतः शीच म्हणुन तो पुढं निघुन गेला.

ते सत्य हलकट, भ्रष्ट पुढार्‍यानही पाहिलं.
पण ते पाहुन बिछान्यात मध्यरात्री फणा काढुन कधीही दंश करण्याच्या तयारीत असलेला नाग
अचानक झोपमोड करुन तोंडासमोर आल्यावर जितकं दचकायला होइल, तितक्या भितीयुक्त रागानं
त्यानं ते सत्य झाकण्याचा ,दूर सारण्याचा प्रयत्न केला.पण ते त्याच्याच्यानं होइना म्हटल्यावर स्वतःच धूम पळत सुटला.
कमालए बुवा. बालकाला सत्य झेपतं. पण पुढार्‍याला नाही!

बालकानं फक्त समोर पाहिलं. गोबर्‍या गालावरचा शेंबुड एका हातानं पुसत, दुसर्‍या हातानं आपली खाकी चड्डी
सावरत आपल्याच आनंदात काही अंतर तो पुढं गेला.
तिथं बसला होता एक आत्म्-मग्न संशोधक्-सायंटिस्ट. त्याच्या हातातही होतं एक सत्य.
आपल्या पोतडीतुन एक एक सत्य बाहेर काढत तो हातातल्या सत्याला जोडुन पहात होता उत्साहानं.
पण असं करुनही,सत्याला सत्य जोडुनही काहिच घडत नाही म्हणल्यावर किंचित निराश व्हायचा.
पण लगेच पुन्हा आशेनं पोतडितल्या नव्या सत्याला हात घालायचा. तेव्हढ्यात समोरुन येणारा बालक
त्याला दिसला.त्याचे डोळे चमकले.श्वास प्रफुल्लित झाला.डोळ्यात कुतुहल साठले.
त्यानं बाळाच्या डोक्यावरुन हात फिरवला.मस्त खाउ दिला हातावर ठेवुन्.आणि घेतलं त्याच्याकडुन सत्य.

आणि काय कमाल! ते त्याच्या हातातील सत्याशी अगदि बरोब्बर मेळ खात होतं. त्याच्याबरोबर चपखल बसलं होतं.
त्यातुन उपजला होता एक प्रत्य्क्ष, सुंदर, उपयुक्त, मानवजातउपकारक शोध!!
त्याच्याही चेहर्‍यावर बालकाचच हसु आलं,उत्साही,निरागस्.अगदि तोच्,त्याच बालकाचा चेहरा बनला सायंटिस्टचा.
त्याच्याडोळ्यात हजार सुर्यांचं तेज, शत्-चंद्रांची शितलता, परमोच्च ज्ञानाचा आनंद आणि ज्ञान पुर्णपणे विसरल्यावर
मिळणार्‍या मुक्तीचा आनंद उमटला.
सायंटिस्ट आनंदाने नाचत त्या शोधाची मुक्त हस्ते उधळण करु लागला.

जगभर तरंग उमटला.जणु येक चमत्कार जाहला.
सृष्टी हर्षानं आंदोळली.सर्वत्र सुखा-समाधानाचं वारं वाहिलं. लोकांना दु:खातुन थोडसं हायसं मिळालं.

त्या शोधानं प्रेमिकाचं व्यंग दूर झालं, त्याला शत-जन्माचं प्रेम मिळालं.
लोकांना त्या शोधाची गरज आहे, असं पाहुन उद्योजकानं तो शोध घाउक प्रमाणात तयार करायला सुरुवात केली.
तो शोध दुकानदाराकडे ठेवला विक्रीसाठी.
त्या शोधरुपी सत्याला किंमत मिळु लागली.दुकानदार पैसे कमवु लागला.
ग्राहकाला नवा शोध त्याच्या किमतीसकट आवडला.त्याच्या अनेक समस्या दूर झाल्या.
पोटही भरलं. सुरक्षितताही मिळाली.
त्याच्या खांद्यात जणु बारा हत्तिंचं बळ आलं!

इकडे दिवस मावळतीला लागला होता.
बालक गेला मनविहारातल्या उत्फुल्ल घरी; नवीन सत्य शोधायला.
सायंटिस्ट कामाला लागला नवा शोध लावायच्या.
सुर्य रात्रीची झोप घेण्या निघाला.
माया नवीन दु:खे, नवीन समस्या शोधु लागली.
थांबलं कुणीच कुणीच नाही. ईश्वरही नाही आणि सैतानही नाही.

हिवाळ्याचे दिवस.. शिशिर ऋतूला नुकतीच सुरुवात झालेली. प्रत्येक लहानमोठय़ा झाडांमधून काही पिवळी पाने डोकावताना दिसली आणि माझ्या नजरेला ती जरा खटकलीच. झाडांचे आणि एकूणच सगळ्या बागेचे निखळ हिरवे सौंदर्य त्यामुळे कमी होत आहे, असे जाणवून मी भराभर सगळी पिवळी पाने झाडापासून वेगळी करून एका टोपलीत जमा केली. समाधानाने परत सगळ्या झाडांवर नजर टाकली, पण तरीही नजर अतृप्तच होती. पिवळी पाने काढल्यानंतर झाडे काहीशी रिकामी वाटू लागली. वाटलं की, पिवळ्या पानांमुळे झाडांची शोभा वाढत नसली तरी झाडे कशी समृद्ध आणि अनुभवी वाटत होती. उगीचच काढली आपण ती पिवळी पाने! आपोआप गळून पडली असती तेव्हा पडली असती. नंतरही कितीतरी दिवस मन खंतावतच होते. काही दिवसांनी काढून टाकलेल्या पानांच्या जागी कोवळी पालवी डोलताना दिसली आणि मी खूश झाले. पिवळ्या पानांचे दु:ख हळूहळू कमी झाले. पण तेव्हापासून ठरवले, मुद्दाम पिवळी पाने कधीच काढायची नाहीत.
मध्यंतरी एकदा एका वृद्धाश्रमाला भेट दिली. तिथे असलेल्या सगळ्या वृद्धांच्या चेहऱ्यावर एक उदास भाव दिसत होता. वर वर जरी ते आमच्याशी हसून बोलत होते, तरी त्यांच्या अंतर्मनात काहीतरी सलत असावे असे वाटून गेले. एकदा वाटलं त्यांच्यापैकी कोणाशी तरी बोलावं, त्यांच्या भावना समजून घ्याव्या, पण मग परत एकदा विचार केला, काय बोलणार ते तरी? काय सांगू शकणार होते? उगीच त्यांच्या जखमांवरची खपली मात्र निघायची, त्यापेक्षा आपणच समजून घेतले पाहिजे.
वृद्धाश्रमातून निघता निघता मला पुन्हा एकदा टोपलीत पडलेल्या पिवळ्या पानांची आठवण झाली. येथील सगळी वृद्ध मंडळी म्हणजे टोपलीत काढून टाकलेल्या पिवळ्या पानांसारखीच होती. पुन्हा पुन्हा कुसुमाग्रजांच्या ओळीच आठवत राहिल्या- ‘जीर्ण पाचोळा पडे तो उदास..’
मागच्या वर्षी कुंभमेळ्यात हरवलेल्या अनेक वृद्ध व्यक्ती, काही वृद्ध जोडपी आपापल्या मुलांना शोधत होती. दूरच्या प्रश्नंतातून आलेली ही मंडळी इथल्या अनोळखी प्रदेशात आधीच कावरीबावरी झालेली असताना तो चेंगराचेंगरीचा भयंकर प्रकार घडला आणि अक्षरश: पालापाचोळ्यासारखी माणसे इतस्तत: विखुरली गेली. अगतिक आई-बाप दूरदर्शनवरून आपल्या मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांना आपापल्या भाषेत विनवत होती, मुलांपर्यंत पोचण्याची केविलवाणी धडपड करत होती. पण खरी परिस्थिती फार वेगळी होती. कल्पनेपलीकडची होती. काही मुलांनी आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. नकोशा झालेल्या आई-वडलांना मोठय़ा धूर्तपणे कुंभमेळ्यात आणून सोडून दिले होते. ही मुलं इतकी कृतघ्न का?
पन्नाशीत आल्यावर माझ्या मनात एक कल्पना सहज डोकावली. आपल्या वयोगटाचा ग्रुप तयार करायचा आणि स्वत:चे एक सोनेरी विश्व तयार करायचे. जमल्यास एकत्र राहायचे. जवळपास घरे घेऊन राहायचे. कारण पन्नाशीत संसाराची हौस बऱ्यापैकी भागलेली असते, मुलांचा हात सुटून ती मार्गाला लागलेली असतात. त्यांना त्यांचे एक वेगळे विश्व सापडलेले असते. आपल्याही प्रकृतीच्या काही न काही तक्रारी सुरू झालेल्या असतात. कोणाला बी.पी., कोणाला डायबेटिस, कोणाला गुडघेदुखी इ. त्यामुळे शारीरिक मर्यादाही आलेल्या अरसतात. त्यातून मुले बाहेरगावी, परदेशात असली तर घरात दोघे नवरा-बायकोच उरतात. मग गाण्याची, चित्रकलेची किंवा वाचनाची आवड असलेल्यांना एकत्र येऊन वर्षभर निरनिराळे कार्यक्रम आखायचे. कधी कुठे चांगला कार्यक्रम असला की एकत्र मिळून जायचे. ही कल्पना बऱ्याचजणींना आवडलीय. ती पुढे कितपत सरकते ते बघायचे.
पाने पिवळी तर होणारच आहेत, ती गळूनही पडणार आहेत, पण असे काही ठोस ठरवल्यास त्यांना टोपलीत पडण्याची भीती वाटणार नाही. कारण त्यांचेच एक सोनेरी विश्व तयार होऊ शकेल. नंतर कधीतरी हिरव्या पानांनाही त्याचे महत्त्व कळणारच आहे आणि झाला तर त्याचा फायदा होणार आहे. कारण जेव्हा त्यांच्यावर वेळ येईल तेव्हा हे सोनेरी विश्व त्यांच्या स्वागतालाही तयार असेल!

"ऐ फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कराना गजब हो गया" हे अख्खं गाणं साधनासाठी चुकूनच लिहिलंय असं मला फार वर्षांपासून वाटत आलं आहे. फार वर्षांपासून म्हणजे, एक - जेव्हा हे गाणं ऐकलं-बघितलं तेव्हापासून, आणि दोन - साधना कोण आणि मधुबाला कोण हे कळायला लागल्यापासून. ज्या वयात मी माधुरीच्या 'एक-दोन-तीन' वर फिदा होऊन स्वतःला अनिल कपूर समजायला सुरुवात केली होती, त्यावेळी बबिता-नंदा, नर्गिस-मीनाकुमारी, साधना-वैजयंतीमाला या जोड्या माझ्यासाठी 'कन्फ्यूजन'चं जिवंत उदाहरण ठरायच्या. पण या सगळ्यांमध्ये आपलं वेगळेपण जाणवून द्यायची, ती एक आणि एकच - मधुबाला. मधुबालाच्या बाबतीत कधीच कन्फ्यूजन झालं नाही आणि तसं होण्याचा चान्सच नव्हता!

टपोरे पाणीदार डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे जिवंत, रसरशीत ओठ, जीव ओवाळून टाकावंसं खळखळणारं हसू, कपाळावर एकाच किंवा दोन्ही बाजूंना मिरवणारं बटेचं अर्धवर्तुळ आणि एकूणच टवटवीत व्यक्तिमत्त्वाच्या मधुबालाने कोणाच्याही मनात घर न केलं तरच नवल! मधुबालाला घडवल्यानंतर देवाने जगात सुंदर स्त्री निर्माण केलीच नाही, या माझ्या ठाम मताला अद्यापही तडा गेलेला नाही. बहुधा तिच्या जन्मानंतर देवानं तो साचाच मोडून टाकला असावा. काय योगायोग आहे पहा, मधुबालाचा जन्म १४ फेब्रुवारीचा (सन १९३३) - म्हणजे साक्षात व्हॅलेन्टाइन डे च्या दिवशीच! या दिवशी एका गुडघ्यावर अर्धवट खाली बसून तिला साधं गुलाबाचं फूल देण्याचाही योग कुणाच्या नशिबात आल होता की नाही कोण जाणे; पण हिनं मात्र उण्यापुर्‍या छत्तीस वर्षांच्या अल्पायुष्यात करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवलं. वयाच्या तेराव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार्‍या मधुबालानं अशोककुमारबरोबर बॉम्बे टॉकिजच्या 'महल' (आयेगा, आयेगा, आयेगा...आयेगा आनेवला...आयेगा...) मधून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दणदणीत पदार्पणाची वर्दी दिली आणि चाहते आणि चित्रपत्रकारिता विश्वाकडून 'वीनस ऑन द स्क्रीन'ची उपाधी मिळवली. अशोककुमारबरोबर 'हावडा ब्रिज', देव आनंद बरोबर 'काला पानी', किशोरकुमारबरोबर 'चलती का नाम गाडी' आणि 'हाफ तिकीट', भारतभूषण नावाच्या ठोकळ्याबरोबर (!! अरेरे!!) 'फागुन', 'गेटवे ऑफ इन्डिया' आणि 'बरसात की रात' हे तिचे लक्षात राहण्यासारखे काही चित्रपट. माझ्या तर ते एक से एक बढकर गाण्यांमुळे आणि त्यात दिसणार्‍या मधुबालेमुळेच लक्षात राहिलेत. हावडा ब्रिज मध्ये गोड हसून, मान वेळावून "आईयेए ए ए ए ए.......मेहेरबाँ" म्हणणारी मधुबाला कोण कशी विसरेल! चलती का नाम गाडी मध्ये "एक लडकी भिगी भागी सी" मधली साडीचा पदर पिळताना वैतागलेली आणि किशोरकुमारला करारी नजरेने खुन्नस देणारी, "पाँच रुपय्या बारा आना" मध्ये त्याच्याचबरोबर बागडणारी आणि निरागसपणे, अल्लडपणे त्याला "हाल कैसा है जनाब का" विचारणारी खट्याळ 'रेणू' कशी बरं लक्षात राहणार नाही?! गेटवे ऑफ इन्डिया मधली "दो घडी वो जो पास आ बैठे" म्हणणारी शांतस्वभावी, मंद हसणारी मधुबाला, काला पानी मध्ये "अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना" म्हणूण देव आनंदच्या नाकदुर्‍या काढणारी मधुबाला आठवणींच्या पडद्यावरून कशी पुसली जाईल? आणि तिच्या कारकिर्दीचा कळस ठरलेला 'मुघल-ए-आझम' - तो कसा विसरता येईल? "मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे" म्हणताना लाजून घूंघट उचलणारी पण त्याचबरोबर भर दरबारात षंढ सलीमला त्याच्या(च!) बापासमोर(च!) छातीठोकपणे "जब प्यार किया तो डरना क्या"विचारणारी अनारकली - विसरू शकू आपण तिला? मुळीच नाही!

या सौंदर्यदेवतेचं पडद्यामागचं आयुष्य मात्र बरंचसं इतरांसाठी जगण्यातच गेलं. आधी दिलीपकुमारची (आइच्यान!!!...दिलीपकुमार????? :( ) प्रेयसी म्हणून, मग किशोरकुमारची बायको म्हणून आणि सदान् कदा अताउल्ला खान या 'पठाणाची मुलगी' म्हणून. दिलीपकुमार आणि मधुबालाचा रोमान्स 'ज्वार भट्टा'च्या (सन १९४४) सेट्सवर चालू झाला, 'तराना' (१९५१) च्या वेळी भरात आला. 'नया दौर'च्या वेळेचे शूटिंगचे शेड्यूल दिलीपकुमारने आपल्या मुलीशी रोमान्स करण्यासाठी सोईचे असे बनवून घेतले आहे, या कारणास्तव अताउल्लासाहेबानं विरोध केला आणि मधुबालाची 'नया दौर' मधून हकालपट्टी होऊन वैजयंतीमाला त्यात आली. सायनिंग अमाउन्टच्या वादावरून निर्माते बी आर चोप्रा यांनी मधुबालाला कोर्टात खेचले आणि दिलीपकुमारने तिच्या व अताउल्लांच्या विरोधात शपथपत्र दिले. सहा वर्षांचा रोमान्स सहा मिनिटांपेक्षा कमी वेळात संपला. किशोरशी मात्र तिचा संसार तसा (बर्‍यापैकी) सुरळीत(च) पार पडला (किशोर अगदी रंगेल गडी असूनसुद्धा!) तिच्या हृदयाला भोक असल्याचे निदान होऊन ती लंडनला उपचारांसाठी गेली आणि तिकडून 'केवळ काही दिवसांचीच पाहुणी'चं सर्टिफिकेट घेऊनच आली. तरीही न खचून जाता तिने राज कपूर बरोबर सिनेसृष्टीत पुनरागमन करायचा प्रयत्न केला. पण सततच्या आजारपणामुळे तो यशस्वी ठरला नाही. डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का देत लंडनहून आल्यावर मधुबाला ९ वर्षे जगली! ५० च्या दशकात तिच्या हॉलिवूडमधल्या पदार्पणाचेही प्रयत्न चालू झाले होते. 'थिऍटर आर्ट' सारख्या मासिकात तिच्यावर पानभर मोठ्या छायाचित्रासह एक लेखही छापून आला होता. पण तिचे हॉलिवूड पदार्पण तसेच राहून गेले. अन्यथा मर्लिन मन्रो वगैरेंसारख्यांना तिने टफ फाइट दिली असती, यात शंकाच नाही. २३ फेब्रुवारी १९६९ ला, आपला ३६ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर १० दिवसांत मुमताज बेगम जेहान् देह् लवी - अर्थात आपल्या लाडक्या मधुबालाने सगळ्यांचा कायमच निरोप घेतला. गंमत अशी की त्या काळात तिच्यावर जी शस्त्रक्रिया होऊ शकली नाही किंवा अयशस्वी झाली, ती सध्या बरीच कॉमन समजली जाते.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला मधुबाला वेगवेगळ्या रूपांत दिसत आली आहे. अगदीच नकळत्या वयात मला ती नेहमीच परीकथांमधली पांढराशुभ्र फ्रॉक घातलेली, पाठीवर दोन पंख आणि हातात जादूची कांडी असलेली परी वाटायची. चलती का नाम गाडी मधली तिची खट्याळ, अल्लड, केसांना दोन रिबिनी बांधलेली निरागस रेणू कॉलेजात जाणार्‍या ताईसारखी वाटली. काला पानी मध्ये ती देवआनंदची प्रेयसी नाही, तर माझी स्वतःची गर्लफ्रेन्ड वाटली. तीच गोष्ट 'मिस्टर एन्ड मिसिज ५५' ची. आणि इतकी सालस आणि सोज्वळ की असे 'बायको मटिरिअल' आईपुढे उभे केले असते, तर तिने हसतहसत, आनंदाने होकार दिला असता ;) मधुबालानंतर माधुरी दिक्षित सोडून इतर कोणातही असा 'कुलीन गृहकर्तव्यदक्षपणा' सापडला नाही, आणि कदाचित सापडायचाही नाही. माधुरीचं मराठमोळेपण कोळणीची चोळी घालून "हमको आजकल है इन्तजार" वर नाचताना जितकं प्रसन्न आणि 'ऑब्विअस' आहे, तितकंच मधुबालाचं निर्मळ, शालीन असणं प्रसन्न आणि स्वाभाविक आहे. मराठमोळी मधुबाला पहायची असेल, तर परकर-पोलकं नेसून आणि काळ्या रिबिनी बांधून केसांच्या दोन वेण्या घातलेली 'नाच रे मोरा अंब्याच्या वनात'वर नाचणारी मधुबाला इमॅजन करा ;) म्हणजे मी काय म्हणतोय, ते ध्यानात येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकदा ती माझ्या लेखनाची प्रेरणा ठरली आहे. भिंतीवरच्या तिच्या भल्यामोठ्या पोस्टरशी संवाद साधताना अस्वस्थ शब्दांना प्रसन्नतेकडे जाण्यासाठीचं तिकीट मधुबालानं फाडावं; तिला कुर्निसात करूनच शब्दन् शब्द कागदावर उतरावा, आणि भानावर यायच्या आत एखादी कविता किंवा गझल तिकडे अवतीर्ण व्हावी; केवळ शब्दांनाच नव्हे, तर मनालाही उभारी यावी, आणि या देवतेला मनोमन मानाचा मुजरा करून आपण एक 'फ्रेश' सुरुवात करायला घ्यावी, यापेक्षा अधिक समर्थ प्रेरणा दुसरी काय असेल? पडद्यावरचा तिचा सफाईदार वावर, कधी लडिवाळ, कधी करारी तर कधी धीरगंभीर, अश्रूपूर्ण डोळ्यांनी आणि कमनीय भिवयांनी बोललेले लाखो संवाद आणि गालावरच्या खळीतून उधळलेले आनंदाचे कित्येक क्षण कैक लोकांच्या आयुषातले हजारो सेकंद उजागर करून गेले असणार, यात शंकाच नाही. मधुबाला 'हॉट' नव्हती, सुंदर होती. शी वाज नॉट 'हॉर्नी', शी वाज ब्यूटिफुल. ती केवळ नावापुरती नाही, तर लौकिकार्थानं 'वीनस ऑन द स्क्रीन' होती, 'गॉडेस्' होती याबाबत दुमत नसावे. मधुबाला हे फक्त एक व्यक्तिमत्त्व, सौंदर्य, वाद, गॉसिप्स, झगमगाट नाही; ते एक चिंतन आहे, समाधी आहे, असं मला वाटतं. आणि अशी समाधी लागली की मी नेहमीच म्हणतो -
दो घडी वो जो पास आ बैठे, हम जमाने से दूर जा बैठे...

...झाल्या बहु, होतीलही बहु, 'परी' हिच्यासम हीच...


लेखातील चित्रपटविषयक व इतर माहितीपूर्ण संदर्भः विकिपिडिया
छायाचित्रांचे सौजन्यः गूगल इमेज सर्च

दुर्दैव, अस्वस्थता या आणि अशा काही संज्ञांच्या व्याख्या जडगोळा तत्त्वज्ञानाची पुस्तके, वर्तमानपत्रांतील लक्षवेधी लेख किंवा थोरामोठ्यांची टाळीबाज व्याख्याने यांतून होतच नसतात. त्या होतात स्वानुभूतीतून. म्हणजे रविवारी ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्‍या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता. "च्यायला!" हा उद्गार म्हणजे त्या दुर्दैवाचे, अस्वस्थतेचे उत्स्फूर्त, मूर्तीमंत, सगुण रूप. परवाच्या दिवशीचा कोसळणारा पाऊस कार्यालयातील माझ्या खुराडात बसून (नुसताच) ऐकताना पदोपदी मला हेच 'च्यायला' माझ्याच आतून ऐकायला मिळत होते.

महिनाभरापूर्वीच भारतात असताना तिथला पाऊस अंगावर झेलला होता. खरे तर भाद्रपदातला पाऊस अंगावर घेणे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे. त्यातून दौर्‍यातला प्रत्येक क्षण 'मंगऽलमूर्ती मोऽरया, गऽणपती बाप्पा मोऽरया' च्या जयघोषात बुडवून घेतलेला. तब्बल चार वर्षांनंतर ऐकलेले ते 'तत्तर तत्तर तत्तर तत्तर..' कानात साठवून घेताना पावसाकडे लक्ष कधी आणि कसे द्यावे?! नाही म्हणायला दोनदा शिवनेरीने मुंबई-पुणे केले तेव्हा घाटात त्याची नि माझी भेट झाली खरी; पण ती सुद्धा एका बंद काचेच्या अल्याड-पल्याडच्या अवस्थेत. एखादा कैदी नि त्याला भेटायला येणारे नातेवाईक जसे बंद गजांच्या अलीकडे-पलीकडे भेटावेत, अगदी तसे! किंवा अमेरिकन दूतावासात व्हिसाच्या रांगेत ताटकळल्यावर बुलेटप्रूफ काचेपल्याडच्या गोर्‍या अधिकार्‍याच्या प्रश्नांची इमानेइतबारे उत्तरे देण्यासाठी उभे रहावे, तसे! फरक इतकाच, की चार वर्षांपूर्वी मी मुंबईतला पाऊस मनात कैद करून घेऊन अमेरिकेत आलो होतो; नि या वर्षी मीच त्याच्याकडे त्याचाच कैदी म्हणून गेलो होतो. ते सुद्धा कोणत्याही व्हिसाशिवाय!

घाटातला पोपटीपिवळा रंग उतरणीला लागलेल्या पावसातही आपला ताजेपणा टिकवून होता. नुकतीच पावसाला सुरुवात झाल्यासारखा. खोपोली ते लोणावळा पट्ट्यामध्ये कोसळणारे दुधी धबधबे, कड्याकपारीमधून अचानक दिसणारे फेसाळते झरे मनातही कित्येक खळखळत्या आठवणी जागे करून जात होते. अशाच एका पावसाने कधी माझी आजी माझ्यापासून हिरावली होती; आणि त्याच वेळी नव्याने ओळख झालेल्या नि कालौघात सर्वोत्तम ठरलेल्या मित्रांशी गाठ घालून दिली होती. चार वर्षांपूर्वीच्या पावसाने मातृभूमी सोडताना असे काही रौद्र रूप दा़खवले होते की हाच पाऊस आपला इतका लाडका का आणि कसा असू शकतो, असा प्रश्न पडला होता. त्यावेळी नवीकोरी पुस्तके नि दप्तरे घेऊन शाळेची धरलेली वाट, रेनकोटाची टोपी मुद्दामहून काढून भिजत घरी आल्यावर आईचा खाल्लेला मार, आले-लिंबू-वेलची-पुदिना घातलेला गरमागरम चहा, हवाहवासा वाटणारा एक चेहरा, निरोप देताना पाणावलेले आईवडिलांचे डोळे, मायभूमीतला चिखल, चौपाटी, ओल्या मातीचा वास, टपरीवरचा चहा आणि वडापाव, उद्यान गणेश च्या मागचा भजीपाव, मित्रमैत्रिणीसोबतचा भिजता टाइम् पास्, सॅन्डविच् नि कॉफी, सगळे डोळ्यांतल्या ढगांमागे सारून विमानात बसलो होतो. आणि यावेळी मात्र कोणाचीतरी आयुष्यभराची साथ, स्वप्ने, आशाअपेक्षा, जबाबदारी आणि प्रेम - सगळे सामावलेली अंगठी बोटात मिरवत! पाऊस मात्र कधीचा पडतच होता नि पडतच राहिला.

पाऊस काय फक्त रेल्वे वाहतूक नि जनजीवनच विस्कळीत करण्यासाठी असतो? छे! तो विस्कळीत करतो एक चाकोरीबद्ध राहणीमान. तुमच्याआमच्यासारख्यांचे भावविश्व खुंटवणारी घर ते ऑफिस, ऑफिस ते घर, लन्च टाइम्, जिम्, स्वयंपाक ही चौकट. पावसासोबत न जगता आल्याने झालेली एकटेपणाची जाणीव आणि पावसाशिवायच्या स्वयंसिद्ध जगण्याची मिजास. मग काहीतरी सुचते, लिहावेसे-बोलावेसे वाटते, कोणासोबत तरी बाहेर जाऊन चिंब भिजावेसे वाटते; वाटते घरी जाऊन दिवाणावर अंग टाकून हजारदा वाचलेले एखादे आवडते पुस्तक हातात घ्यावे, आवडती गझल लावावी आणि कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात करावी; उगाचच दूरच्या मित्राला फोन लावून वाफाळत्या कॉफीचा कप हातात घेऊन तासन् तास गप्पा छाटाव्यात आणि ते सुद्धा पॅशिओचा दरवाजा सताड उघडा टाकून त्यालाही फोनवर तो पाऊस ऐकवत. वाटते जमेल तेव्हढा काळोख करून कोचावर पडावे आणि कोसळणारा पाऊस नुसता कानभर साठवून घ्यावा. बोलायचे, सांगायचे तर असते पुष्कळ पण..

.. पण आउटलुक मधला मीटिंग रिमाइन्डर् त्याच वेळी समोरच्या स्क्रीनवर कडमडतो. 'डिस्मिस्' म्हणावे की 'स्नूझ इन् फाइव् मिनट्स ' वर क्लिक् करावे या विचारापर्यंत पोचण्याच्या आतच हृदयाने नकळत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असतो - "च्यायला!"

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.

यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात......

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील

बघ माझी आठवण येते का??
मुसळधार पाऊस......
ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का..
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
इवलासा मेल वाचून बघ...
बघ माझी आठवण येते का????

वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
डोळे मिटुन घे.तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.
इनबॉक्स वर ये.तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग.
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.
वाचत राहा मेल संपेपर्यंत.
तो संपनार नाहीच.
शेवटी मेल बंद कर.डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस.
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.
आता दुसऱ्या मेलची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का???.

घड्याळात पाच वाजतील.
तुला निघायची घाई असेल.
तितक्यात एक मेल येईल.
तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ.
तो विचारील तुला मेल न करण्याचे कारण.
तु म्हण सर्व्हर डाऊन होता.
मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर..तुही वाच.
तो पुन्हा फॉरवर्ड करेल.
तू तो डीलीट कर.
एखादी कविता वाच.
बघ माझी आठवण येते का???

मग निघायची वेळ होईल.
तो म्हणेल काळजी घे स्व:ताची..,
मग तुही तसेच लिही.
मेल मागून मेल येतील.
फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होतील.
शेवटी सगळे डीलीट कर.
बघ माझी आठवण येते का???

बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.......
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.....
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही............
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही...........
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही........
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही............
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत

अजुनही आठवतयं मला
तो लिंबोणीच्या फांदीचा झुला
त्यावर बसून हसत म्हणायचीस..
"मुर्खा, बघतोस काय झुलव ना मला.."

अजुनही आठवतयं मला
तो तुला आवडणारा पाऊस
मला विसरून म्हणायचीस,
"पावसा, बघतोस काय चिंब भिजव ना मला.."

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते फुलपाखरू
त्याकडे हात लांबवत म्हणायचीस..
"पाखरा, बघतोस काय तुझ्या पाठीवर घे ना मला"

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते बेडकाच पोहणं
त्याला हुश्श करून म्हणायचीस..
"बेडका, पाण्याचा ठाव कुठे आहे सांग ना मला"..

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते सोनचाफ्याच झाडं,
त्याला पाहुन लाजून म्हणायचीस..
"चाफ्या, माझ्या लग्नात तुझ्या फुलांची माळ घालीन त्याला.."

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारा तो बर्फाचा गोळा..
तो खाताना ओठांवरून जिभ फिरवत म्हणायचीस..
"गोळावाल्या, अजुन थोडासा गोड कर ना याला"

अन आजसुद्धा तु तशीच आहे,
हे पानीपुरी खाताना पाहीलं
अन तेव्हा माझं मन खरचं,
तुझ्या त्या छकुल्या कुशीला कवटाळत राहीलं.


मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही

आलाय प्रेम आणि विश्वासाचा हा उत्सव गुलाबी..
आनंदाचे इन्द्रधनु उमटो तुझ्या आयुष्याच्या नभी..

प्रेमाने सजो तुझे जीवन..
जसे पारिजातकाच्या सडयाने फुलते अंगण..

मिळो तुला ती नजर,जी करेल तुझ्या ह्रदयात घर..
साथ निभाव नेहमीच,नको करु दुनियेची फिकर..

गुलाब आणि गिफ्ट्स ही होतील जुने..
अंतकरणातून साद दे,जोड तू मने..

स्वीकार तू नकार ही,जे असेल तुझे..ते तुला मिळेलही
ऐक पण..
'प्रेम दिन' जरी एक दिवसाचा..
'ख-या' प्रेमाचा उत्सव जीवनभराचा..

आता कुठॆ सुरवात ही झाली.................
मानात नकार आणि ऒठावर हॊकार
वॆळ पडली कि घॆतलि माघार
जगाची कॆली त्यानॆ रित स्विकार

हॊतॆ गाठायचॆ यशाचॆ शिखर
सुरु झाली त्याचि धडपड,
गॆला जीव कुणचा न कॆली फिकर

हॊती त्यास कुणाचि परवा
न राहिलॆ जगाचॆ भान
जिंकित गॆला तॊ नॅहमिच
चढला मग त्यास गुमान

पादाक्रांत करीत गॆला एक एक टप्पा
प्रॅमाच्या झाल्या नुसत्याच गप्पा
वापरलॅ त्यानॆ तिलाही नॅहमी
प्रॅमाच्या हॊता डाव फसवा

म्हणतात प्रॆम आंधळॆ असतॆ
तिहि कुठॆ अपवाद हॊती
सवॅ काहि दॆऊनि
राहिली रीत्या हाती

कळाली तीलाहि जगाचि रित
शॆवटचा डाव तिनॆ खॆळिला
उत्तुंग शिखराचा मॊह त्यालाही पडला

लाविलॆ पणास सवॅ,खॆळली शॆवटचि बाजि
कळायला झाला उशीर गमावलॆ सवॅ काहि
हपापलॆलॆ चॆलॆहि माग दुर झालॆ
हॊती आता खरी परिक्शा

मनातुनि आवाज आला
दिली साद मग त्यानॆ तीला,
नॆहमी प्रमाणॆ ती आलि
घॆउनि हातात हात म्हणालि
आता कुठॆ सुरवात ही झाली


स्त्री काय आहेस तू...

जिवाश्मांची वसूंधरा तू,
योवनाची कामिनी तू,
हिमतीची वाघिनी तू
कुळाची स्वामिनी तू...

आकाशी धगधगती सौदामिनी तू,
ओलावून बरसणारी श्रावणी तू,
उन्हात गारव्याची सौमिनी तू,
थंडीच्या शहार्‍यात उबेची दुलई तू...

पतीची अर्धांगिनी तू,
लेकराची माऊली तू,
भावाची पाठराखीण बाहीण तू,
मैत्री जपणारी सखीण तू...

ज्ञानाचा प्रसार करणारी विद्या तू,
स्वरांची सुरेल सरस्वती तू,
शब्दातून जिवंत अशी कविता तू,
साहित्याचे जल वाहणारी सरीता तू...

चंद्राच्या अस्तित्वाला जागणारी पोर्णिमा तू,
चांदण्याच्या सहवासाला भावणारी अमावस्या तू,
वर आकाशी अस्तित्वातली नक्षत्र वैभवी तू,
आम्हास स्वप्नात घेवून जाणारी निद्राणी तू...

वस्त्रहरणातली पांडवधू द्रोपदी तू,
दृष्ट रावण लंका विध्वंस कारणी सीता तू,
सावळ्या कान्ह्याची यशोदा माय तू,
शृपणकेच्या अवतारतली एक हाय तू...

शिवबाची जिजाऊ तू,
राणी झाशीची बळकट बाहू तू,
पेशव्यांची आवड मस्तानी तू,
ताजमहालाची प्रेमळ निशाणी तू...

पौराणातली आदिशक्ती तू,
प्रभुची नितांत भक्ती तू,
सळसळत्या मावळ्यांची जय भवानी तू,
राक्षसांना बधणारी काली माता तू..

आजच्या युगाची प्रगती तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
कलेच्या क्षेत्रात नटराजाची मुर्ती तू,
खरचं सार्‍यांच्या यशाची किर्ती तू...

तुज वाचून न कुठला जीव,
तुजवाचून ना कुठली नीव,
वंदितो तुला हे स्त्री शक्ती,
कारणी आजही तुजवाचूनी
ना कुठला इंद्र ना कुठलाच शिव....

ना संपणार तुझे अस्तिव,
ना तू विरळ होणार,
तुझवाचून हे विश्व आपूले,
किती काळ टिकणार...

"विरहात तुझ्या ..."
विखुरले गं क्षण सारे
रिक्त झाली आज माझी ओंजळ
तु मात्र गेलीस निघुन अशी
ओठी तव ते हास्य प्रांजळ..!!!

चाहुल तुझ्या प्रेमाची लागली,
मन माझे झाले दिवाणे....
गेलीस निघोनी आज अशी
लुप्त झाले सारे तराणे..!!!!

ना राहिली वेळेची खबर मज आता
ना आता राहतो काळाचा पत्ता
तुला का असावी जाणीव याची
ह्रदयी माझ्या अजुनही तुझीच सत्ता..!!!

फरफट होऊ लागली गं माझी,
तीळ-तीळ तुटलो गं मी,
तुच शिकवलेस प्रेम मला
सांग कुठे नेमका पडलो कमी...??

जाशील अशीच अजुन दुर तु,
होशील नव्या जगी तु रममाण,
काळही चालत राहील,जगही धावेल
मी मात्र राहीन असाच निष्प्राण, असाच निष्प्राण....!!!

चुक मी केली त्या क्षणी ..
तीळ तीळ तोड़ते ती मला प्रत्येक क्षणी..

प्रेम केले तिने माझ्यावर बिनशर्त..
पन माझ्या प्रेमात होती फ़क्त शर्त

मला तिच्या स्वप्नातला राजकुमार म्हणत होती..
तिच्या स्वप्नांकडे पहायला तेव्हा फुरसतच नव्हती ...

रात्रि जागुन काढल्या तिने आठवानित माझ्या ...
मी निर्धास्त झोपलो सोडून आठवणी तिच्या ....

बोलने माझे तिच्या डोळ्यात पानी टचकन आणायचे..
तिच्या डोळ्यात पानी पाहून मन आनंदून जायचे..

झुगारून प्रेम तिचे, वैरी जालो मी तिच्या प्रेमाचा....
"नेहमी खुश रहा"..म्हणुन निरोप दिला तिने प्रेमाचा...

आज तिच्या आसवांची किंमत माला कलते आहे....
माझ्या आसवानी त्याची परतफेड मी करतो आहे.....

चुकलो, चुकलो मी म्हणुन मन माझे रडते आहे...
रोज तिला शोधण्यासाठी आकाश पाताल एक करतो आहे....

प्रेम करणं सोपं नसतं

सर्व करतात, म्हणून करायच नसतं

चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं

पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं

तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं

शाळा कॉलेजांत असच घडतं

एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं

जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं

ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं

करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं

सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं

हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं

पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं

फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं

मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं

डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं

आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं

एवढ सगळं करणं खुप कठीण असतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं................

जेंव्हा जीवाचं शिवाला,
रंकाचं रावाला,
भक्ताचं देवाला,
न सांगताही कळलं जातं.
तेंव्हाच आपोआप...
मैत्रीचं नातं जुळलं जातं.

मैत्री मैत्री असते,
मैत्री जन्मदात्री असते,
मैत्री म्हणजे खात्री असते,
मैत्री म्हणजे पत्रापत्री असते,
मैत्री म्हणजे,
कधी तीची,कधी त्याची,
भर पावसात,
उन्हाळ्याच्या दिवसात,
दोघांत....
फक्त एकच छत्री असते.

मैत्री म्हणजे लुकलुकणारं चांदणं,
मैत्री म्हणजे हातावरचं गोंदणं,
मैत्री म्हणजे मना-मनातल्या
तणाचं वेळोवेळी निंदणं !
मैत्री म्हणजे,
एकमेकांच्या कुशीत स्फुंदनं !!

मैत्री रडवते,
मैत्री हसवते,
मैत्री सांगुन फसवते,
मैत्री मना-मनात नवा स्वर्ग वसवते !!

मैत्री विहिरीतला पारवा,
मैत्री रानातला सरवा,
मैत्री उन्हातला गारवा,
मैत्री मिसळीतला झणझणीत शरवा !!

राधेचा संग असते मैत्री,
मीरेचा रंग असते मैत्री,
द्रौपदीचे न उलगडलेले
गुढ अंग असते मैत्री.
कधी कर्ण दुर्योधनाच्या
प्रेमात दंग असते मैत्री.

मैत्री क्षणभर टेकायला हक्काचं स्थळ देते,
मैत्री लागेल एवढी कळ देते,
मैत्री जगायला आभाळाएवढं बळ देते !!

About this blog

About Me

• » ι ℓσνє мυѕι¢,ѕнαソαяι,gαzαℓѕ,ѕмѕ,ρσєтяソ &αмρ; мαкє @ ηєω ƒяιєη∂ѕ... « •

Member

Blog Archive

Blog Archive